
Germany Jobs Crisis: Germany मध्ये कामगारांची तीव्र कमतरता; भारताकडून कुशल कामगारांची वाढती मागणी
Germany Jobs Crisis: जर्मनी सध्या कुशल कामगारांच्या तीव्र कमतरतेचा सामना करित आहे. ज्येष्ठ कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे आणि तरुण उमेदवारांच्या कमतरतेमुळे देशातील अनेक उद्योगांना धोका निर्माण झाला आहे. या लोकसंख्याशास्त्रीय संकटावर मात करण्यासाठी, जर्मनी अधिकाधिक भारताकडे वळत आहे. बर्टेल्समन फाऊंडेशनच्या एका अहवालानुसार, जर्मन अर्थव्यवस्थेला दरवर्षी २,८८,००० परदेशी कामगारांची गरज आहे. २०४० पर्यंत जर्मनीच्या मनुष्यबळात १०% घट होऊ शकते. जर्मनीचा कमी जन्मदर ही एक समस्या असली तरी, भारतात २५ वर्षांखालील ६० कोटी लोक आहेत, त्यामुळे कामगारांचा उपलब्ध आहे.
RBI on Indian Economy: भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल! म्हणाले की, जागतिक अस्थिरतेतही भारत..
२०२२ मध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारामुळे भारतीयांना तिथे काम शोधणे सोपे झाले. जर्मनीने २०२४ च्या अखेरपर्यंत भारतीय नागरिकांसाठी कुशल कामगार व्हिसाचा कोटा दरवर्षी २० हजारांवरून ९० हजारांपर्यंत वाढवला. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये जर्मनीमध्ये केवळ २३ हजार ३२० भारतीय कामगार होते, तर २०२४ पर्यंत ही संख्या १,३६,६७० पर्यंत वाढण्याचा अंदाज होता. ‘इंडिया वर्क्स’ आणि ‘मॅजिक बिलियन’ सारख्या भरती एजन्सी भारतीय तरुणांना शिकाऊ उमेदवारीसाठी व नोकऱ्यांसाठी सातत्याने जर्मनीला पाठवित आहेत.
भारतीय तरुण आता जर्मनीमध्ये कसाई, बेकर, मेकॅनिक, रस्ते बांधणारे आणि बालवाडी शिक्षकांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअर करित आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोमवारी एका दिवसाच्या व्हेरिएबल रेट रेपो (व्हीआरआर) लिलावाद्वारे प्रणालीमध्ये ७९, २५६ कोटी रुपयांची तात्पुरती तरलता ओतली आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रक नुसार, ही रक्कम ५.२६ टक्के कट-ऑफ आणि भारित सरासरी दराने ओतण्यात आली. ही रक्कम १ लाख कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होती.
India-Argentina Trade: संकटात ‘हा’ देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा
आगाऊ कर भरल्यामुळे बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त तरलतेमध्ये मोठी घट झाली. २३ मार्चपर्यंत बैंकिंग प्रणालीतील तरलतेची तूट ६५,३९५.६४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी २० मार्च रोजी मध्यवर्ती बँकेने तीन दिवसांच्या VRR लिलावाद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये २५,१०१ कोटी रुपयांची तात्पुरती तरलता ओतली होती. आरबीआयने १७ मार्च रोजी सात दिवसीय व्हीआरआर लिलावाद्वारे ४८,०१४ कोटी रुपयांची तरलता ओतली. जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत, आरबीआयने सरकारी रोख्यांच्या खुल्या बाजारातील खरेदीद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये ३.५० लाख कोटी रुपयांची कायमस्वरूपी तरलता ओतली आहे.