
भारत-भूतान रेल्वे धावणार! (Photo Credit- X)
🚨 BREAKING: India announces ₹4,033 cr plan to build first-ever rail links with Bhutan: – Kokrajhar–Gelephu (69 km)
– Banarhat–Samtse (20 km) 🇮🇳🚆🇧🇹 pic.twitter.com/NVFIxZVYOX — Beats in Brief 🗞️ (@beatsinbrief) September 29, 2025
केंद्र सरकारने एकूण ₹४,०३३ कोटी खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे.
१. कोकराझार (आसाम) ते गेलेफू (भूतान) रेल्वे मार्ग:
या रेल्वे प्रकल्पांमुळे भूतानमधील गेलेफू (जागरुकतेचे शहर) आणि समत्से (औद्योगिक शहर) ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जातील. तसेच, भारत भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याने, हे रेल्वे मार्ग भूतानच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, भारत आणि भूतानमध्ये “अतुलनीय विश्वास, परस्पर आदर आणि समज” आहे, जो सांस्कृतिक संबंध आणि सामायिक सुरक्षा हितांवर आधारित आहे. भारताने भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी (२०२४-२०२९) ₹१०,००० कोटींची मदत देण्याचे वचन दिले आहे, जी मागील योजनेपेक्षा दुप्पट आहे. हे भारताचे भूतानच्या विकासातील महत्त्वाचे योगदान दर्शवते.