
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स (IndiaFirst Life Insurance) ही विमा कंपनी, विमा क्षेत्रात ‘बँकाश्युरन्स’ (Bancassurance) म्हणजेच बँकेमार्फत विमा विक्री प्रणाली आधारेच विमा वितरणाला प्राधान्य देणार आहे. या वितरण प्रणालीवर नियामक संस्थांचे बारीक लक्ष असले, तरीही याच प्रणालीला आपल्या वितरण धोरणाचे मुख्य केंद्र मानते असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी यांनी ठामपणे सांगितले. बँकाश्युरन्स हा कंपनीच्या वितरण धोरणाचा गाभा आहे आणि त्यातून व्यवसायाचे उत्कृष्ट परिणाम मिळत आहेत असंही गांधींनी अधोरेखित केलयं.
चालू आर्थिक वर्ष म्हणजेच, २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत, इंडियाफर्स्ट लाईफने ४४% ची दमदार वाढ नोंदवली. ही वाढ मुख्यत्वे त्यांच्या बँक भागीदारांच्या मजबूत कामगिरीमुळे झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने २२% आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ने १७% वाढीस हातभार लावला. त्याच काळात, कंपनीच्या खासगी एजंट मार्फत विक्रीतही दमदार वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एजंट मार्फत झालेल्या विक्रीत पाचपट वाढ झाली आहे. ग्रामीण भागात प्रादेशिक बँकांच्या विलीनीकरणामुळे वितरणावर काही काळ परिणाम झाला असला तरी, बँकांची पुनर्रचना आता पूर्ण होत आली आहे. त्यामुळे आता परिस्थिती स्थिर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
एजन्सी नेटवर्कच्या विस्तारासाठी भरीव गुंतवणूक करण्यात आली आहे. तरी इंडियाफर्स्ट लाईफला आपला ‘व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस’ मार्जिन गेल्या वर्षीच्या १७.६ टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे. ऋषभ गांधींनी या यशाचे श्रेय व्यवसायाच्या सुधारित गुणवत्तेला, पॉलिसी टिकवून ठेवण्याच्या विक्रमी दराला आणि कंपनीच्या स्थापनेपासून ‘बँकाश्युरन्स’ मार्फत झालेल्या विक्रीतून कमीत कमी तक्रारींना दिले आहे.
कंपनी आता केवळ बँकांपुरती मर्यादित न राहता सगळीकडे आपली उपस्थिती वाढवत आहे. गेल्या आर्थिक वर्षात, एजंटच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करण्यात आला. या वर्षी तो २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.
इंडियाफर्स्ट लाईफ चालू आर्थिक वर्षाचा शेवट ९६ शाखा आणि दहा हजारहून अधिक एजंटांसह करण्याच्या मार्गावर आहे. कंपनीला त्यांच्या बँक भागीदारांद्वारे २५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचता आले आहे, आता एजंटच्या नेटवर्कच्या विस्ताराने त्यांना आणखी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी सुमारे दोन तृतीयांश हिस्सा ‘बँकाश्युरन्स’चा राहिला. उरलेला एक तृतीयांश हिस्सा एजन्सी आणि इतर माध्यमांचा राहिला. त्यात ब्रोकिंग, थेट विक्री आणि डिजिटल माध्यमांचा समावेश आहे. पूर्वी बँकाश्युरन्सचा वाटा एकूण व्यवसायात ९० टक्क्यांहून अधिक होता. पण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे.
हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात आज होणार दमदार सुरुवात! कोणते शेअर्स चमकणार? जाणून घ्या सविस्तर
इंडियाफर्स्ट लाईफ भविष्यात आरोग्य आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रातील संधींचे देखील मूल्यांकन करत आहे. परंतु कंपोझिट परवान्यासंबंधी स्पष्टतेची वाट पाहत आहे. कंपनीने आपले आयपीओ (IPO) पुढे ढकलले आहेत, रद्द केलेले नाहीत असे स्पष्ट केले आहेत. आयपीओची वेळ बाजाराची परिस्थिती अनुकूल असण्यावर आणि भविष्यतील तिमाहींमध्ये वाढ कायम राहण्यावर अवलंबून असेल. बाजाराची स्थिती आणि बाहेरची आव्हाने मर्यादित असणे यावरही वेळ अवलंबून असेल. अंतिम निर्णय भागधारक घेतील. असेही कंपनीने स्पष्ट केले.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्राहक परतावा आणि अपेक्षित गुंतवणूक कामगिरी यांच्यात किमान २०० बेसिस पॉइंट्सचे अंतर राखते. कंपनीची ताळेबंद आणि ग्राहकांना दिलेली दीर्घकालीन हमी दोन्ही सुरक्षित ठेवते. सुमारे ७५ टक्के पोर्टफोलिओ फॉरवर्ड रेट ऍग्रीमेंट्सद्वारे व्याज दराचा धोका सांभाळण्यास मदत होते. एलआयसीने (LIC) एफआरए बाजारात प्रवेश केल्यामुळे पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. बाजार पुढील काळात कसा वाढतो यावर भविष्यात कंपनी बाँड फॉरवर्ड्सकडे वळू शकते. इंडियाफर्स्ट लाईफ एजटंमार्फत विस्ताराला गती देण्यात आली असली किंवा नवीन संधी शोधत असली तरीही, ‘बँकाश्युरन्स’ हाच कंपनीचा मुख्य आधारस्तंभ राहील.