Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा प्रश्नावरून राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बांग्लादेशबाबत केली ‘ही’ महत्वाची मागणी!

बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता.७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात राजू शेट्टी यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करण्याची मागणी केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 07, 2024 | 06:40 PM
कांदा प्रश्नावरून राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बांग्लादेशबाबत केली 'ही' महत्वाची मागणी!

कांदा प्रश्नावरून राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बांग्लादेशबाबत केली 'ही' महत्वाची मागणी!

Follow Us
Close
Follow Us:

बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसणार आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशला पाठवले जाणारे हे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता.६) “कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भाव कोसळणार” या शीर्षकाखाली ‘डिजिटल नवराष्ट्र’ने मंगळवारी (ता.६) वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांदा प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा : कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भाव कोसळणार!

काय म्हटलंय राजू शेट्टी यांनी आपल्या पत्रात?

बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्याने कांद्याची वाहतूक होत नसल्याचे राजू शेट्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा : बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करत असल्याने, या घडामोडींमुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

Web Title: Raju shetty letter to pm modi on onion issue political instability of bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 06:40 PM

Topics:  

  • onion export
  • raju shetty

संबंधित बातम्या

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
1

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
2

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

#BringbackMadhuri: केंद्र सरकार कुणावर मेहरबान; माधुरीच नाही तर विदर्भातील १९ वाघही वनतारात, नेमकं चाललंय काय?
3

#BringbackMadhuri: केंद्र सरकार कुणावर मेहरबान; माधुरीच नाही तर विदर्भातील १९ वाघही वनतारात, नेमकं चाललंय काय?

Raju Shetti : 15 ऑगस्ट ला ग्रामसभांच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार
4

Raju Shetti : 15 ऑगस्ट ला ग्रामसभांच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.