
Reliance Industries-Jioचा एआय मिशन; १० गिगावॅट ग्रीन एनर्जीवर एआय डेटा सेंटर उभारणार
Reliance Industries-Jio Mission: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये घोषणा केली की त्यांची कंपनी पुढील सात वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे जिओने मोबाइल डेटा परवडणारा आणि सुलभ बनवला आहे, त्याचप्रमाणे सामान्य भारतीयांसाठी एआय देखील परवडणारा बनवला जाईल.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की जिओने भारताला इंटरनेट युगाची ओळख करून दिली आणि आता देशाला विकसित करण्यासाठी वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती आणेल. त्यांनी यावर भर दिला की भारताने एआय सारख्या तंत्रज्ञानासाठी परकीय अवलंबित्व अर्थात दुसऱ्या देशांचा सहारा घेण्याचा धोका पत्करू नये.
हे देखील वाचा: Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
जिओ आणि रिलायन्स संयुक्तपणे तीन प्रमुख स्तंभांवर ही गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. यामध्ये गिगावॅट-स्केल एआय डेटा सेंटर हे महत्वाचे म्हणजेच १० गिगावॅट पर्यंतच्या ग्रीन एनर्जीचा वापर करून जामनगरमध्ये एआय-रेडी डेटा सेंटर स्थापित केले जातील, असे सांगितले. राष्ट्रव्यापी एज-कॉम्प्यूट लेयर म्हणजे देशभरात कमी-विलंब एआय सेवा प्रदान करण्यासाठी एज-कॉम्प्यूट पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील, जिओच्या टेलिकम्युनिकेशन नेटवर्कसह एकत्रित केल्या जातील. सार्वभौम संगणकीय पायाभूत सुविधा देखील महत्वाच्या आहेत.
हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी, चांदीच्या किंमतीही वधारल्या! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये
भारतासाठी एक स्वदेशी आणि सुरक्षित एआय संगणकीय परिसंस्था विकसित केली जाईल, ज्यामुळे एआय सेवा किराणा दुकाने, दवाखाने, शाळा आणि शेतांपर्यंत पोहोचू शकतील. मुकेश अंबानी यांनी हे “राष्ट्र उभारणीत संयमी आणि शिस्तबद्ध भांडवली गुंतवणूक” असे वर्णन केले, केवळ व्यावसायिक फायद्यासाठी केलेले पाऊल नाही. त्यांनी सांगितले की जिओ भारतातील एआय परिवर्तनात मध्यवर्ती भूमिका बजावेल, प्रत्येक नागरिक, प्रत्येक क्षेत्र आणि सरकारी सेवांना बुद्धिमत्तेशी जोडेल. ही गुंतवणूक भारताला एआयमध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि डिजिटल क्रांतीच्या पुढील टप्प्यात नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते.