Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी… रिलायन्स कंपनी ‘या’ राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशात 500 बायोगॅस प्लांटमध्ये सुमारे 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 12, 2024 | 09:09 PM
आनंदाची बातमी... रिलायन्स कंपनी 'या' राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

आनंदाची बातमी... रिलायन्स कंपनी 'या' राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वातील कंपनी रिलायन्सस इंडस्ट्रीज लिमिटेडने बेरोजगार तरुणांसाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशात 500 बायोगॅस प्लांटमध्ये सुमारे 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन एनर्जी इनिशिएटिव्ह अंतर्गत गुजरात बाहेरील कंपनीत रिलायन्सने केलेली आतापर्यंतची ही सर्वाधिक गुंतवणूक असणार आहे.

रिलायन्स-आंध्र प्रदेश सरकारचा सामंजस्य करार

क्लीन एनर्जी इनिशिएटिव्हचे नेतृत्त्व मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजिव अनंत अंबानी करत आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. अंनत अंबानी आणि आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांच्यात नुकतीच या संदर्भात मुंबईत बैठक झाली आहे. या बैठकीत योजनेला अंतिम रूप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आज (ता.१२) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत विजयवाडा येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आंध्र प्रदेश उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

हे देखील वाचा – एनटीपीसीच्या आयपीओची किंमत 100 रुपयांहून अधिक राहण्याची शक्यता, पुढील आठवड्यात होणार खुला!

आंध्र प्रदेश सरकारने नुकत्याच अधिसूचित केलेल्या एकात्मिक क्लीन एनर्जी पॉलिसीअंतर्गत बायो फ्यूल प्रोजक्ट्सला प्रोत्साहन दिले आहे. यात पाच वर्षांसाठी सीबीजी प्लांट्सवरील निश्चित भांडवली गुंतवणुकीवर 20 टक्के भांडवली सबसिडी तसेच एसजीएसटी आणि पाच वर्षांसाठी वीज शुल्काची संपूर्ण परतफेड समाविष्ट आहे.

काय म्हटलंय माहिती-तंत्रज्ञान मंत्र्यांनी?

या सामंजस्य कराराबाबत बोलताना आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी सांगितले आहे की, राज्यात रोजगार निर्मिती वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आमच्या एकात्मिक क्लीन एनर्जी पॉलिसीअंतर्गत बायो फ्यूल प्रोजक्ट्सला प्रोत्साहन देत आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आंध्र प्रदेश उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार होत आहे, याचा सर्वाधिक आनंद होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून 65000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असेही नारा लोकेश यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील वाचा – नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

तरुणांसाठी गेम चेंजर ठरेल ही गुंतवणूक

रिलायन्सने केलेली 65000 कोटींची गुंतवणूक आंध्र प्रदेशातील तरुणांसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास नारा लोकेश यांनी व्यक्त केला आहे. 250000 नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, रिलायन्स केवळ सरकारी नापीक जमिनींचे नूतनीकरण करणार नाही तर शेतकऱ्यांसोबत काम करेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना बायो फ्यूल प्रोजक्ट्सच्या लागवडीचे प्रशिक्षण देणार आहे. शेतकरी दरवर्षी त्यांचे उत्पन्न 30000 रुपये प्रति एकर वाढवू शकतील, असेही सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे.

Web Title: Reliance industries limited will invest rs 65000 crores in andhra pradesh 250000 people will get employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
1

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

संरक्षकांचा सन्मान: वनतारा आपल्या काळजीवाहकांच्या पाठीशी कशी उभी राहते? वाचा सविस्तर
2

संरक्षकांचा सन्मान: वनतारा आपल्या काळजीवाहकांच्या पाठीशी कशी उभी राहते? वाचा सविस्तर

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?
3

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये
4

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.