Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: निर्धारित क्षेत्रापैकी ८२ टक्के रब्बी पेरणी पूर्ण; हरभरा, गहू पिकांना शेतकऱ्यांची पसंती

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी निर्धारित क्षेत्रापैकी तब्बल ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेतीत उतरले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 21, 2025 | 03:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • निर्धारित क्षेत्रापैकी तब्बल ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली
  • एकूण ३ लाख २९ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
  • जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी ७९ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावर झाली
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, खरीप पिके हाती येण्याच्या टप्प्यावर निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसल्याने लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असतानाही शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामासाठी पुन्हा नव्या जोमाने शेतात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली असून, निर्धारित क्षेत्रापैकी तब्बल ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम

यंदा रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात एकूण ३ लाख २९ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ७१ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीत पुरेशी ओलावा टिकून राहिल्याने रब्बी पिकांच्या पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असून रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामातील पिकांमध्ये यंदा हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी ७९ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्याखालोखाल गहू आणि मका या पिकांचे क्षेत्र आहे. हरभरा हे तुलनेने कमी खर्चाचे आणि अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्राधान्य दिले आहे. तसेच सध्या असलेली थंडी हरभरा पिकासाठी पोषक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. गव्हाच्या पेरणीचे उद्दिष्टही जवळपास पूर्णत्वाकडे गेले असून, गहू पेरणीचे उद्दिष्ट सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत साध्य झाले आहे.

दरम्यान, मक्याच्या पेरणीनेही यंदा विक्रमी टप्पा गाठला आहे. मक्याची पेरणी उद्दिष्टाच्या १३८ टक्के क्षेत्रावर झाली असून सुमारे २४ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. याशिवाय रब्बी ज्वारीची पेरणीही ७ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रावर झाली असून या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी नवीन पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशील शेतकरी हळद, अद्रक, चिया, राजमा यांसारख्या पिकांची लागवड करत असून, यातून शाश्वत उत्पादन आणि अधिक उत्पन्न मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेस मुदतवाढ; ३८ हजार २२ शाळांची माहिती अद्याप प्रलंबित

दरम्यान, तेलवर्गीय पिकांचा पेरा मात्र यंदा कमी झाल्याचे चित्र आहे. शासनाकडून तेलवर्गीय पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी शेतकरी नगदी पिकांनाच अधिक पसंती देत आहेत. जिल्ह्यात करडईची पेरणी केवळ २२ हेक्टर, तीळ १७ हेक्टर आणि सूर्यफुलाची पेरणी फक्त २३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गळीतधान्यांचे सरासरी पेरणी क्षेत्र १ हजार ९८४ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ २०० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. एकूणच रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: 82 percent of the targeted area for rabi sowing has been completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • akola news
  • buldhana news

संबंधित बातम्या

Akola News : “एकरी फक्त 300 रुपये विमा?” अकोल्यात संतप्त शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर महामोर्चा!
1

Akola News : “एकरी फक्त 300 रुपये विमा?” अकोल्यात संतप्त शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर महामोर्चा!

कोर्ट फी स्टॅम्पची जादा किंमतीने विक्री! नागरिकांची चालली आर्थिक लूट; १०० रुपयांचा मुद्रांक १५० ला
2

कोर्ट फी स्टॅम्पची जादा किंमतीने विक्री! नागरिकांची चालली आर्थिक लूट; १०० रुपयांचा मुद्रांक १५० ला

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
3

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.