फोटो सौजन्य - Social Media
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२५-२६ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे कि या अर्थ संकल्पात तरुण, महिला, शेतकरी आणि देशातील गरिबी रेषेच्या खालच्या समुदायाचा विचार करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ‘या’ निर्णयांबद्दल:
तरुणांमध्ये विज्ञान क्षेत्राचा प्रसार करण्याचा निर्धार या अर्थ संक२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.ल्पनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अर्थ संकल्पनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि येत्या ५ वर्षांमध्ये देशात जवळजवळ ५० हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहे. याचा तरुणांना मोठा लाभ घेता येणार आहे. तसेच या डिजिटलायजेशनच्या युगात, बजेटमध्ये एक महत्वाची बाब मांडण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल ब्रॉडबँड बसवण्यात येणार आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमधील डिजिटल अंतर कमी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये आरोग्य विभाग उभारण्यावर लक्ष दिले जाईल.
स्पर्ध्येच्या या युगात कौशल्य असणे फार महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने तरुणांच्या कौशल्यात वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. कौशल्य वाढीसाठी देशात पाच नॅशनल सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच या दरम्यान भारतीय भाषा पुस्तक स्कीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय भाषांमध्ये पुस्तके पोहचवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रार्थमिक आणि उच्च शिक्षणाच्या पुस्तकांना डिजिटल माध्यमातून उपल्बध करण्यावर भर दिला जाणार आहे. येत्या पाच वर्षात IIT आणि IISC क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी आणि रिचर्स या विभागात फेलोशिप पुरवण्यात येणार आहे. एकूण १० हजार फेलोशिप पुरवण्यात येणार असून रिचर्स क्षेत्रात वाढ करण्यावर खास लक्ष देण्यात येणार आहे.
निर्मला सीतारामन यांनी सांगितले कि २३ IIT क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षात डबल झाली आहे. IIT पटना तसेच इतर IIT महाविद्यालयांच्या Infrastructure मध्ये सुधार करण्यात येणार आहे. येत्या वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे सारं दिसून येणार आहे. देशात एकूण ७५ हजार सीट्स वैद्यकीय क्षेत्रात वाढवण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात हा बदल दिसून येणार आहे.