Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी होणार सुरु? ५०% प्रवेश पूर्ण झाल्यावर लगेच कॉलेजचे दारं उघडणार

शिक्षण संचालनालयाने अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टऐवजी १ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच शाळांना वर्ग सुरू करता येणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2025 | 03:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या वर्गांच्या सुरुवातीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी ११ ऑगस्ट २०२५ पासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाने निर्देश दिले होते. मात्र आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेपैकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुलै २०२५ पासून वर्ग सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.

आता दारू पिण्याऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ देशात दारू पिण्यासाठी चक्क 10 हजार लोकांची होणार भरती, मिळणार नोकरी

या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, सहाय्यक संचालक आणि शिक्षण निरीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना पाठवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष दरवर्षी उशिरा सुरू होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रवेश प्रक्रियेचा दीर्घ कालावधी. शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश पूर्ण होईपर्यंत वर्ग सुरू करता येत नाही, त्यामुळे वर्गाच्या सुरुवातीला मोठा विलंब होतो.

मात्र यंदा, या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि अभ्यासक्रमाच्या वेळेवर परिणाम होऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाची प्रतीक्षा करत वर्ग सुरू करण्यास उशीर होतो, ज्यामुळे महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे नियोजन उशिरा सुरू होते आणि विद्यार्थी मानसिकदृष्ट्याही संभ्रमात राहतात. त्यामुळे या समस्येचे निराकरण करत, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेश क्षमतेपैकी किमान ५० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, अशा संस्थांना १ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाने या निर्णयाचा लाभ घेऊन वेळेवर अध्यापन सुरू करावे, अशी स्पष्ट आणि ठाम सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

काकरापार NPCIL भरती 2025: 17 जूनपर्यंत अर्ज करा, नवशिक्या व अनुभवी उमेदवारांसाठी संधी

शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२५ रोजी घेतलेल्या मूळ निर्णयामध्ये अकरावीच्या वर्गांची सुरुवात ११ ऑगस्ट २०२५ पासून करण्याचे निर्देश होते. मात्र आता, सुधारित सूचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि त्यांच्या वेळेचे नुकसान टाळण्यासाठी या तारखेला लवचिकता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावीच्या वर्गांचे नियोजन लवकर करता येणार असून, वेळेवर अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षांसाठीही अधिक तयारीचा वेळ मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, उलट त्यांना अभ्यासासाठी पुरेसा कालावधी मिळेल. परिणामी, पालक आणि शिक्षकवर्ग देखील या निर्णयामुळे समाधान व्यक्त करीत असून, या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Early start 11th admissions maharashtra 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Online Admission

संबंधित बातम्या

11th Admission: पहिल्या फेरीत ६.३२ लाख विद्यार्थ्यांना मिळाले कॉलेज; ‘या’ तारखेपासून प्रवेश सुरू
1

11th Admission: पहिल्या फेरीत ६.३२ लाख विद्यार्थ्यांना मिळाले कॉलेज; ‘या’ तारखेपासून प्रवेश सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रिया स्थिरतेकडे; कोटांतर्गत पहिली प्रवेश यादी जाहीर
2

अकरावी प्रवेश प्रक्रिया स्थिरतेकडे; कोटांतर्गत पहिली प्रवेश यादी जाहीर

JNVST Class 6 admission 2026 :जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता ‘6 वी’ साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज….
3

JNVST Class 6 admission 2026 :जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता ‘6 वी’ साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज….

11th admission: ११ विची प्रवेशप्रक्रीया पुन्हा नव्याने आजपासून सुरु; कसा भरायचा फॉर्म? जाणून घ्या
4

11th admission: ११ विची प्रवेशप्रक्रीया पुन्हा नव्याने आजपासून सुरु; कसा भरायचा फॉर्म? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.