
फोटो सौजन्य - Social Media
नवी दिल्ली : Central Board of Secondary Education (CBSE) ने बुधवारी इयत्ता दहावी (२०२५-२६) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा एकूण निकाल ९३.७० टक्के लागला असून, तो गेल्या वर्षीच्या ९३.६६ टक्क्यांच्या तुलनेत ०.०४ टक्क्यांनी वाढला आहे.
यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपली आघाडी कायम ठेवली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.९९ इतका नोंदवला गेला, तर मुलांचा निकाल ९२.६९ टक्के आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा निकाल ८७.५० टक्के लागला असून, सर्व घटकांमध्ये समाधानकारक चित्र दिसून आले आहे.
देशभरातील विभागनिहाय निकालात Trivandrum आणि Vijayawada यांनी ९९.७९ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले. Chennai (९९.५८%), Bengaluru (९८.९१%) आणि Delhi West (९७.४५%) या विभागांनीही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. दरम्यान, Nagpur शहरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराचा गौरव वाढवला. पोद्दार स्कूलचा विद्यार्थी पूर्वेश कापसे याने ९९ टक्के गुण मिळवले, तर भवन्स त्रिमूर्ती नगरची विद्यार्थिनी अवंतिका चौरसिया हिने ९८.६ टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश मिळवले.
निकालानंतर काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण न मिळाल्यास निराश होण्याचे कारण नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. बोर्डाकडून १५ मे २०२६ पासून ‘इम्प्रूव्हमेंट परीक्षा’ (टप्पा २) आयोजित केली जाणार असून, विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. एकूणच, यंदाचा निकाल समाधानकारक ठरला असून मुलींची सातत्यपूर्ण आघाडी आणि विविध शहरांतील उच्च निकालामुळे सीबीएसईचा शैक्षणिक दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
Brihanmumbai Municipal Corporation च्या शिक्षण विभागातील सीबीएसई संलग्न ११ शाळांनी इयत्ता दहावी (२०२५) परीक्षेत ९२.८९% निकालासह उल्लेखनीय यश मिळवले. एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मिठागर सीबीएसई शाळेची आर्या लामने (९७.८%) प्रथम आली. सौरभ यादव, कौस्तुभ त्रिपाठी, आर्यन मयेकर, श्रेया सिंग आणि माही सोळंकी यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. गणित, विज्ञान, इंग्रजीत प्रगती दिसली असून मराठीत अनेकांना पैकीचे गुण मिळाले. हे यश शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे फलित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.