Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या मुलांना दाखवा आपल्या देशाचा गौरव! अशाप्रकारे पटवून द्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व

पालकांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व ओळखण्यासाठी खेळ, चित्रपट, पुस्तकं आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा उपयोग करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 13, 2025 | 07:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

येणाऱ्या 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये या निमित्ताने अनेक उपक्रम राबवले जातील. मात्र, मुलांना फक्त शाळा आणि पुस्तकांमधूनच नव्हे, तर घरातही देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या कथा सांगणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा कथांमुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनात देशाबद्दलचा आदर आणि प्रेमाची भावना घट्ट रुजते. म्हणूनच, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकांनी आपल्या मुलांना या दिवसाचे महत्त्व आणि देशाचा गौरवशाली इतिहास समजावण्यासाठी पाच सोपे आणि रोचक उपाय अवलंबावेत.

भारतीय नौदलात अप्रेन्टिस भरती! १३०० हून अधिक रिक्त पदे भरणार, आजपासूनच करा अर्ज

घरातच एक छोटेखानी प्रश्नमंजुषा घेता येईल, ज्यामध्ये 15 ऑगस्टशी संबंधित प्रश्न विचारता येतील. उदा. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? पहिले पंतप्रधान कोण होते? राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाइन केला? योग्य उत्तर देणाऱ्या मुलांना छोटेखानी बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन देता येईल. अशा पद्धतीने खेळत खेळत मुलांना देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजू शकते.

टीव्ही हेदेखील मुलांना या दिवसाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, तिरंगा फडकावतात आणि भव्य परेड तसेच देशभक्तीपर कार्यक्रम होतात. हे पाहताना मुलांना त्या क्षणाची ऐतिहासिक आणि भावनिक महत्ता अनुभवता येते. यावर्षी 15 ऑगस्टला लॉन्ग विकेंड असल्याने, पालक मुलांना एखाद्या ऐतिहासिक स्थळी घेऊन जाऊ शकतात. बाहेर जाणे शक्य नसेल, तर शहरातीलच स्वातंत्र्य संग्रामाशी किंवा इतिहासाशी संबंधित स्थळांना भेट देता येईल. यामुळे मुलांचा देशाशी भावनिक संबंध अधिक घट्ट होईल.

शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी! शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

तसेच, मुलांना स्वातंत्र्य सेनान्यांवरील चित्रपट दाखवणे हाही उत्तम पर्याय आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित चित्रपट मुलांना त्या वीरांच्या संघर्षाची आणि त्यागाची जाणीव करून देतील. याशिवाय, त्यांच्या वय आणि समजुतीनुसार इतिहासावरील पुस्तके भेट देऊन वाचनाची सवय लावल्यास त्यांचे ज्ञान वाढेल आणि देशाबद्दलचा अभिमान व आपुलकीची भावना आणखी दृढ होईल.

Web Title: Glory of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Independence Day Recipe
  • india

संबंधित बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
1

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.