
IAS
चिन्मयी गोपाल या २०२४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रतिष्ठीत संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीधर असणाऱ्या चिन्मयी गोपाल यांनी यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा प्राप्त केली. अर्थशास्त्राच्या या ज्ञानामुळे त्यांना यूपीएससीची तयारी करण्यास मदत झाली नाही तर प्रशासनातील तळागाळाच्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत झाली.
नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?
चिन्मयी गोपाल या हूशार आणि विचारशील अधिकारी म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी कित्येक कर्मचाऱ्याची गैरकृत्ये उघडकीस आणली आहेत. यांची ख्याती केवळ फाईल आधारित अधिकारी म्हणून मर्यादित नाही. जेव्हा त्यांना असे अहवाल मिळाले की काही गावांमध्ये योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची कमतरता आहे. तेव्हा तिने कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता स्वत: सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्या गावोगावी फिरून रहिवाशांशी बोलल्या. चौकशीत त्यांना असे उघड झाले की, काही कर्मचारी जाणीवपूर्वक पात्र लोकांना सरासरी योजनांपासून वंचित ठेवत आहेत. यानंतर त्यांनी निष्काळजी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आणि सार्वजनिक हक्कांशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले.
चिन्मयी गोपाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांनी पदावर असताना बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरूद्ध भूमिका घेतली. ज्यामुळे त्यांची एक प्रामाणिक आणि कडक प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली.
अधिकारी बनायचंय? मग UPSC ची तयारी करताना चुकूनही करू नका ‘या’ ५ चुका.
टीना दाबी सध्या टोंकच्या जिल्हाधिकारी आहेत तर चिन्मयी गोपाल यांची पहिली जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती टोंकमध्येच झाली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठीत लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. यापूर्वीही य़ा दोघींनी बाडमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी संभाळली आहे.
त्या एक कठोर, पारदर्शक आणि जमिनीवर काम करणाऱ्या अधिकारी मानल्या जातात. म्हणूनच टीना दाबी यांच्यानंतर त्यांनी बाडमेरची सूत्रे हाती घेणे. जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल मानला जात आहे.