
iit madras
IIT Madras : गेल्या ७ दशकं केवळ अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), तंत्रज्ञान आणि संशोधन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘IIT मद्रास’च्या प्रतिमेत आता मोठा बदल होत आहे. आजवर इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाणारी ही संस्था आता डॉक्टर तयार करण्याची तयारी करत आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आयआयटी मद्रास सज्ज झाले असून, यासाठी ‘स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस’ ची सुरुवात केली जाणार आहे. येथे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील. एका एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रो. कामकोटी त्यांनी सांगितले की, आयआयटी मद्रास ‘स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस’ सुरू करेल आणि येथून विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्या मिळवता येतील.
आयआयटी मद्रासचे प्रो. कामकोटी यांनी स्पष्ट केले की, संस्था वैद्यकीय क्षेत्रात अगदीच नवीन सुरुवात करत नाही; यापूर्वीच मे २०२३ मध्ये संस्थेने ‘वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची’ सुरुवात केली होती. या उपक्रमासह हा भारताचा पहिलाच विभाग ठरला होता. आता चार वर्षांच्या अंडरग्रॅजुएट पदवीच्या वैद्यकीय शिक्षणाची सुविधा दिली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना हायब्रिड ग्रॅजुएट म्हणून तयार केले जाते. त्यांनी सांगितले की, या पदवींमध्ये अंडरग्रॅजुएट (MBBS), पोस्टग्रॅजुएट (MD) आणि डॉक्टोरल (PhD) यांचा समावेश असेल.
Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा
केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्हीझीनाथन कामकोटी यांची भेट घेतली, ज्याचे फोटो त्यांनी ‘एक्स’ (X) वर शेअर केले आहेत. दोन फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “आयआयटी मद्रासच्या संचालकांना भेटून आनंद झाला.” पुढे त्यांनी लिहिले की, ‘आयआयटी मद्रास शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सतत नवीन उच्चांक गाठत आहे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रमुख संस्था म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. संस्थेची उत्कृष्ट कामगिरी आणि भारताच्या ‘नॅलेज इकोसिस्टम’मधील योगदानास नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रो. कामकोटी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.’
आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्हीझीनाथन कामकोटी यांच्या मते, तांत्रिक संस्थांना आता मेडिकल स्कूल सुरू करण्याची तीव्र गरज आहे. यामागील मुख्य कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, कोरोना महामारीनंतर आधुनिक वैद्यकीय शास्त्र पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून झाले आहे. अशा परिस्थितीत, जीवनरक्षक तंत्रज्ञानासाठी कोणत्याही देशाने परदेशावर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणूनच भारताला इतर देशांकडून तंत्रज्ञान विकत घेण्याऐवजी, ते स्वतःच्या देशातच विकसित करावे लागेल.
Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!
आयआयटी मद्रासचा हा उपक्रम केवळ पारंपरिक डॉक्टर तयार करण्यासाठी नाही, तर मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञान एकाच मंचावर आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आजच्या काळात आजारांवर अचूक उपचारासाठी एमआरआय (MRI), प्रगत वैद्यकीय इमेजिंग सिस्टीम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक सर्जरी आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांचे महत्त्व वेगाने वाढले आहे. अशा वेळी हेल्थकेअर सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंगचा मेळ घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आयआयटीच्या या पाऊलमुळे देशाचे वैद्यकीय क्षेत्र तांत्रिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि आत्मनिर्भर होईल.