
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री, महापौर, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिबिरातील प्रमुख उपक्रम
या शिबिरात महसूल विभागासह महाराष्ट्र शासनाच्या इतर विविध विभागांचे अंदाजे 40 स्टॉल्स लावण्यात येणार असून यामध्ये उत्पन्न दाखला, तात्पूरता रहिवास दाखला, जेष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात येणार आहे.
शिधा पत्रिकाः
नवीन शिधा पत्रिका मिळवणे, नाव कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचे अर्ज स्वीकारून कार्यवाही, तसेच लाभार्थीना शिधा वाटप करणे.
योजनांची माहिती : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणी करणे.
आधार कार्डः आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष कक्षाची व्यवस्था.कामगार विभाग, महिला व बाल कल्यान विभाग, समाज कल्यान विभाग, टपाल विभाग, विधी व न्याय विभाग, शिक्षण विभाग, आर्थिक विकास महामंडळ, नशाबंदी महामंडळ अशा विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.
नागरिकांनी परिपूर्ण सादर केलेल्या अर्जावर एकाच दिवसात दाखले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता 10 वी व इयत्ता 12 च्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येऊन या शिबिरांचे सर्वांकरिता अयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संजयगांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे लाभ तसेच भूमापन व भूमिअभिलेख अंतर्गत मिळणाऱ्या सेवांचा सुध्दा समावेश करण्यात येणार असून इतर विभागांशी सुध्दा समन्वयाव्दारे विविध सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.