सौजन्य - सोशल मिडीया
काही विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधल्यानंतर “निधी उपलब्ध नाही, मागणी करण्यात आली आहे” असा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. संबंधित विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करावी, निधी वितरणातील दिरंगाईबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही यासाठी शासनाने विद्यापीठांशी समन्वय साधावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एका बाजूला सरकार अनावश्यक गोष्टीवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे व देशाचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘निधी नाही’ असे लाजिरवाणे उत्तर दिले जात आहे. सरकारने तातडीने थकीत शिष्यवृत्ती वितरित करावी आणि विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही याची हमी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’ – अक्षय जैन, प्रदेशाध्यक्ष, माध्यम विभाग, युवक काँग्रेस






