मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
मादाम कामा मुलींचे वसतिगृह येथे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी या संवादादरम्यान विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यापीठाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची आणि शैक्षणिक संधींची माहिती विद्यार्थ्याना दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत वसतिगृहातील शैक्षणिक व निवासी वातावरण अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृहास प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जगन्नाथ शंकरशेठ मुलांचे वसतिगृहास क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर नवीन मुलींचे वसतिगृह येथे अधीक्षक डॉ. मधुरा कुलकर्णी आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
How to Learn Coding: कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य वय आणि सोपा मार्ग

