
pm modi
PM Modi Monitoring NEET: नीट युजी (NEET UG) पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सुनवणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एटीए (NTA), राधाकृष्णन समिती आणि परीक्षा सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न विचारले तर दुसरीकडे सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत, तसेच हे प्रकरण सरकार गांभीर्याने घेत आहे.
नीट युजी पेपर लीक प्रकरणाची सुनावणी सुरू होताच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, एनटीए आणि राधाकृष्णन समितीने आपापली प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणावर टिप्पणी केली. सुनावणीदरम्यान, समितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्णन यांनाही थेट प्रश्नही विचारला की, “जेव्हा समिती देखरेख करत होती, तेव्हा ही यंत्रणा अपयशी कशी ठरली?”
TET Exam: शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; ‘टीईटी’साठी मिळाली ‘या’ वर्षापर्यंत मुदतवाढ!
यावर डॉ. राधाकृष्णन यांनी उत्तर दिले की, समितीने २०२५ ची नीट युजी परीक्षा एकंदरीत समाधानकारक पद्धतीने पार पडली होती. तसेच समितीने एनटीएला परीक्षा प्रक्रिया अधिक मजबूत करण्याची शिफारस दिली आहे. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या री नीट परीक्षेत सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी न्यायालयाला दिली.
या सुनवणीदरम्यान सर्वात मोठे विधान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडून आले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून पंतप्रधान मोदी स्वत: या प्रकरणाचे मॉनिटरिंग करत आहेत. परीक्षा पद्धत पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चित केली आहे. तोपर्यंत एनटीए, केंद्र सरकार आणि तज्ञ समितीला न्यायालयाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. आता नीट परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पुढे कोणती पावले उचलली जातात आणि दोषींवर कधीपर्यंत कारवाई होते, याकडे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.