Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

Aamir Khan's third wedding: 'शेखर Tonite' शोमध्ये शेखर सुमन यांनी आमिर खानवर मिश्कील टोला लगावला. “ट्रिपल इंजिन सरकार चालवत आहेत” म्हणत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 10:12 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aamir Khan’s third wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काही दिवसांपूर्वी तिसरी विवाहसोहळा पार पडला. आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं.त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत आणि चर्चा देखील होत आहे. अशातच आता अभिनेते शेखर सुमन यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य करत टोमणा मारला आहे.

शेखर सुमन यांचा ‘शेखर Tonite’ हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोने अल्पावधीतच नवनवीन विक्रम मोडले आहेत. शेखर सुमन सहसा आपल्या विनोदातून सत्ताधारी सरकारसह राजकीय आणि इतर विषयांवर भाष्य करतात, पण यावेळी त्यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य केले. ६१ वर्षीय आमिर खानने नुकतेच तिसरे लग्न केले आहे. शेखर सुमन यांनी ‘शेखर Tonite’वर याच कार्यक्रमात आमिर खानच्या लग्नाचा संदर्भ देत राजकीय घडामोंडीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी राजकारण्यांनी आमिर खानकडून नवीन आणि जुन्या दोन्ही पक्षांचा समावेश असलेल्या आघाड्या कशा सांभाळाव्यात हे शिकले पाहिजे. त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, जिथे राजकीय पक्ष ‘डबल-इंजिन सरकार’ चालवू शकत नाहीत, तिथे आमिर खान ‘ट्रिपल-इंजिन सरकार’ चालवत आहे, आणि तेही अगदी अचूकपणे.

शेखर सुमन म्हणाले की, आमिर खानने येणाऱ्या पिढ्यांना एक अनोखी दृष्टी दिली आहे. आणि ती दृष्टी म्हणजे, एखादे ध्येय साध्य होईपर्यंत त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहणे. शेखर सुमन यांनी म्हटले की, आमिर खान कोणतीही गोष्ट परिपूर्ण होईपर्यंत त्यावर काम करत राहतो.

अभिनेत्याच्या तीन लग्नांचा संदर्भ देत त्यांनी त्यांची तुलना इंजिन आणि डब्याशी केली. ते म्हणाले, “असे म्हटले जाते की राजकारण्यांना आघाड्यांची चांगली जाण असते. पण त्यांनी या गृहस्थाकडून योग्य आघाड्यांचा सल्ला घ्यायला हवा. त्यांनी पहिली आघाडी केली आणि ती तुटली. त्यांनी दुसरी आघाडी केली आणि तीही दुर्दैवाने तुटली. आता त्यांनी तिसरी आघाडी केली आहे. मला वाटते की याला आता आघाडी न म्हणता महाआघाडी म्हटले पाहिजे. बघा, पक्ष डबल-इंजिन सरकार चालवू शकत नाहीत आणि ते ट्रिपल-इंजिन सरकार चालवत आहेत.”

शेखर सुमन पुढे म्हणाले, “आणि या विलक्षण माणसाचं नाव आहे… एक मिनिट थांब, गौरी… तुझ्या लक्षात आलं असेल की, जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करायचो, तेव्हा एका ठराविक अंतरावर, एका विशिष्ट स्टेशनवर, इंजिन ड्रायव्हर एक बोगी बाजूला काढून दुसरी जोडायचा. मग, पुढे जाऊन तो दुसरी बोगी बाजूला काढून तिसरी जोडायचा. आणि थोडं पुढे जाऊन, तो बाजूला काढलेल्या पहिल्या दोन बोगी तिसऱ्या बोगीला जोडायचा. आणि अशाप्रकारे, एक संपूर्ण, लांब ट्रेन तयार व्हायची. हा तोच इंजिन ड्रायव्हर आहे ज्याचं कौशल्य अतुलनीय आहे. तो अद्वितीय, विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे. कल्पना करा की हे एक असं इंजिन आहे जे पेट्रोल, इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉल एकत्र करून बनवलं आहे. तरीही, हे इंजिन कधीही बंद पडलं नाही, आणि नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आपल्या रुळांवर धावत आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर आमिर खान. अभिनंदन, आमिर खानने तिसऱ्यांदा यशस्वी लग्न केलं आहे.”

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’

यापुढे शेखर सुमन यांनी आपल्या खास विनोदी शैलीत आमिर खानवर आणखी टोलेबाजी केली. ते म्हणाले, “इतर कोणाचे ‘अच्छे दिन’ येवोत वा न येवोत, पण खान साहेबांचे मात्र सलग तिसऱ्यांदा अच्छे दिन आले आहेत. आमिर खानने पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे.”

यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मिश्किल उल्लेख करत शेखर म्हणाले, “आता तर मोदीजीही विचारात पडले असतील. ते म्हणत असतील, ‘मी नुकताच नेहरूंचा विक्रम मोडला आणि हा आमिर कुठून आला?’ “अशा प्रकारे शेखर सुमन यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची फिरकी घेतली.

Prajakta Gaikwad : शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ता गायकवाडची पंढरीवारी; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक, शेअर केलं सुंदर फोटो

 

Web Title: Actor shekhar suman took a dig at aamir khan while commenting on his third marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • PM Modi
  • Shekhar Suman

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा
1

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.