Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सुरक्षेत मोठी वाढ! राज्यस्तरीय दक्षता समिती होणार स्थापन

महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, कॉपीमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 21, 2026 | 07:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षांचा दर्जा, विश्वासार्हता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार रोखणे, कॉपीमुक्त वातावरण निर्माण करणे आणि परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी आता राज्यस्तरावर स्वतंत्र ‘राज्यस्तरीय दक्षता समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

पगार मिळवा एक लाख! सर्वोच्च कोर्टात नोकरीची संधी… असे करा अर्ज

सध्या जिल्हास्तरावर दक्षता समित्या कार्यरत असल्या तरी, राज्यभरातील परीक्षा व्यवस्थापनात अधिक प्रभावी समन्वय, नियंत्रण आणि एकसंध अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यस्तरीय समितीची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक शिस्त आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहेत. या परीक्षांमध्ये कॉपी, गैरप्रकार, तणावाचे वातावरण किंवा अनुचित हस्तक्षेप यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर शांत, तणावमुक्त आणि निकोप वातावरण निर्माण करणे हा या समितीचा प्रमुख उद्देश असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढ होण्याच्या दृष्टीने कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या या राज्यस्तरीय दक्षता समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथील अध्यक्षांचा समावेश असेल. याशिवाय राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलिस महानिरीक्षक, सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांचे अतिरिक्त आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक तसेच शिक्षण संचालक (योजना) हे सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. विविध विभागांचा समन्वय साधून परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, हा या समितीचा मुख्य हेतू आहे.

या समितीमार्फत परीक्षा काळात अचानक तपासण्या, तक्रारींची तत्काळ दखल, परीक्षा केंद्रांवरील शिस्तबद्धता आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. पोलिस प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत केला जाणार असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर त्वरित कारवाई होईल, असे संकेत शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

Thane News: ‘मराठी भाषेसाठी सर्वांनी सजगपणे योगदान द्यावे’ डॉ. प्रदीप कर्णिक यांचे आवाहन

राज्यस्तरीय दक्षता समितीच्या स्थापनेमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परीक्षा केवळ गुणांसाठी नव्हे, तर गुणवत्तेसाठी असावी, हा संदेश या निर्णयातून स्पष्टपणे दिला गेला असून, येत्या परीक्षांमध्ये अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक व्यवस्था पाहायला मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Web Title: Now security for the 10th and 12th grade examinations will be significantly increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी ८१ जणं निलंबित! बारावी परीक्षेमध्ये २३३ गैरप्रकार तर दहावीत ३६ प्रकरणे
1

दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी ८१ जणं निलंबित! बारावी परीक्षेमध्ये २३३ गैरप्रकार तर दहावीत ३६ प्रकरणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.