
nta
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एनटीएने अनेक महत्त्वाच्या सुधारणांसाठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता परीक्षेची सुरक्षा आणि डिजीटल यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत केली जाणार आहे. त्यामुळे एनटीए एजन्सीमध्ये पारदर्शकता वाढवणे, प्रशासकीय सुधारणा लागू करणे आणि संपूर्ण यंत्रणेवर बारकाईन लक्ष ठेवणे या महत्त्वपूर्ण कामांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणार आहे. याशिवाय, एनटीएने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO – Chief Technology Officer), मुख्य वित्त अधिकारी (CFO – Chief Finance Officer) आणि महाव्यवस्थापक-एचआर (General Manager-HR) यांसारख्या मोठ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, आता परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात तांत्रिक सुरक्षा उपाय लागू केले जातील. यामध्ये एआय (AI) आणि डेटा अनालिटिक्सचा वापर करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक ओळख आणि चेहऱ्यांची ओळख पटवणाऱ्या यंत्रणा अधिक मजबूत केल्या जातील.
एनटीए दरवर्षी देशभरात 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. परिणामी, अलीकडच्या पेपरफुटीच्या वादामुळे एटीएच्या विश्वासार्हतेवर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.