Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान तालुकास्तरावरील प्रश्नपत्रिका कस्टडीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केल्याने त्यांच्या नियमित अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 07:43 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान प्राथमिक शिक्षकांची नेमणूक
  • नियमित अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा
  • माध्यमिकची कामे प्राथमिकला का दिली जातात?
Amravati News :दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान तालुकास्तरावरील प्रश्नपत्रिका कस्टडीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केल्याने त्यांच्या नियमित अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करू नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

वर्गाचे शैक्षणिक नुकसान

फेब्रुवारी-मार्च महिन्यात दरवर्षी १२ वी व १० वी वर्गाची बोर्डाची परीक्षा घेतली जाते. या परीक्षांकरिता पेपर ठेवण्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर सुरक्षिता म्हणून आणि परीक्षा केंद्राला पेपरचे वाटप करण्याकरिता कस्टडी दिली जाते. या कस्टडीचे प्रमुख हे त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी असतात आणि त्यांना सहकारी म्हणून हे अधिकारी केंद्रप्रमुख किंवा प्राथमिक शिक्षकांना घेतात. ही परीक्षा जवळपास एक महिना चालते या शिक्षकांच्या नेमणुकीमुळे त्यांच्या वर्गाचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या परीक्षेकरिता प्राथमिक शिक्षकांना घेऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

प्राथमिक शिक्षक समितीचं आवाहन

१० वी व १२ वी वर्गाचीपरीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाद्वारे घेण्यात येते. परीक्षा केंद्राला पेपर पुरविण्याकरिता एका ठिकाणी सुरक्षित कस्टडी तयार करण्यात येते. येथे शिक्षण विभागातील अधिकारी व सहाय्यक यांची नेमणूक असते. नियमानुसार या कस्टडीत सहाय्यक म्हणून एका लिपिकाची व शिपाई यांची नेमणूक करावी लागते. पण, शिक्षण विभागातील अधिकारी या कस्टडीत प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करतात आणि घडणार्या प्रकाराला बळी पडतात. असे प्रकार घडू नये आणि प्राथमिक शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा बोडॉने अशा कस्टडीत प्राथमिक शिक्षकांना नेमणूका देऊ नये आणि अशा नेमणूका शिक्षकांनी नाकाराव्यात, असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे.

माध्यमिकची कामे प्राथमिकला का दिली जातात?

नुकताच अमरावती जिल्हात घडलेला पेपर फुटीचा प्रकार आणि या प्रकरणात ठरवलेले प्राथमिक शिक्षकांना दोषी हे प्रशासनाचे बळी आहे. या प्रकरणात प्रभारी गटशिक्षणाधिकारी, प्रभारी प्राथमिक शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होण्यापूर्वी या बाबतची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. प्राथमिक विभागाचे कार्य सोडून माध्यमिक विभागाची कामे प्राथमिक शिक्षकांना का दिली जातात या बाबत चौकशी व्हावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Web Title: Primary teachers committee objects to board exam duties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news

संबंधित बातम्या

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका
1

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.