Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTI च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांहून कमी आहे. त्यांच्या पाल्यांना RTI अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश मिळणार आहे. तसेच काही आणखीन पात्रता निकषांना पात्र असल्यावरच पालकांना अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 15, 2025 | 03:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने २०२५ साठी ‘Right to Education’ (RTE) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया मंगळवार, दिनांक १४ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पालकांना आपल्या मुलांसाठी अर्ज करायचा असल्यास ते अधिकृत संकेतस्थळ student.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे या मुदतीपर्यंत इच्छुक पालकांना त्यांच्या पाल्याचे ऍडमिशन करावे लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे.

बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! IBPS ने २०२५-२६ मधील भरतीचे वेळापत्रक केले जाहीर

शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ च्या कलम १२ (१) (सी) नुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील मुलांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अनुदानित नसलेल्या शाळा, पोलीस कल्याण शाळा (अनुदानित नसलेल्या) आणि महापालिकांच्या (स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमध्ये प्रवेशाचा अधिकार आहे. या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. मुळात, या निकषांच्या आधारे पालकांना त्यांच्या पाल्यासाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ‘हे’ निकष:

अर्ज करण्यास इच्छुक पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांहून कमी असणे गरजेचे आहे. २५% आरक्षित जागा असल्याने, या जागांसाठी अर्ज करताना १० शाळांची निवड करावी लागणार आहे. ही निवड अतिशय काळजीपूर्वक करायची आहे. अर्ज करण्याअगोदर पालकांना शाळा आणि घर यामधील अंतर तपासावे लागणार आहे. हे अंतर गूगल मॅपद्वारे निश्चित करावे लागणार आहे. अर्ज दिलेल्या मुदतमध्येच भरण्यात आला पाहिजे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहू नका, अंतिम तारखेला तांत्रिक समस्या उदभवनीच्या शक्यता असतात त्यामुळे जितके लवकर होईल तितके लवकर आणि काळजीपूर्वक अर्ज करा. अर्ज करताना योग्य माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये घराचा पत्ता, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश होतो.

शालेय शिक्षण विभागाच्या योजनांचा आढावा; गुणवत्ता सुधारणा आणि डिजिटल शाळांमध्ये भर

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आरटीईच्या २५% आरक्षित जागांवर यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. जर एखाद्या मुलाने चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळले, तर तो प्रवेश रद्द केला जाईल. पालकांनी एका वेळेस केवळ एक पूर्ण अर्ज सादर करावा. कोणतेही दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू नयेत. पालकांनी वरील सर्व गोष्टींची दक्षता घेत वेळेत अर्ज सादर करावा, जेणेकरून त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळेल.

Web Title: Rti admission process begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Educational News
  • Right To Education Act

संबंधित बातम्या

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी
1

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा
3

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.