Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

शिक्षणाचा अधिकार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया २०२६ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) कोट्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2026 | 12:54 PM
'आरटीई' प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

'आरटीई' प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:

पुणे : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया २०२६ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) कोट्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्यानुसार अपेक्षित १० टक्के जागा न भरल्याने हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याची बाब उघड झाली आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) आरक्षण अधिनियम, २०२४ (दि. २६ फेब्रुवारी २०२४) नुसार आरटीई अंतर्गत राखीव जागांपैकी १० टक्के जागा एसइबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवणे अपेक्षित आहे. त्यानुसार १० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालानंतरची आकडेवारी पाहता या कोट्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यभरातून एकूण २ लाख ८९ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवडीत एसइबीसी प्रवर्गातील किमान १० हजार ५८१ विद्यार्थ्यांना संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८०९ विद्यार्थ्यांचीच निवड झाल्याने तब्बल ९ हजार ७७२ जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे.

आरटीई कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असून, खाजगी शाळांमध्ये वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या आरक्षणात एसईबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गांचा समावेश होतो. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींमुळे आरक्षणाचा उद्देशच धोक्यात आल्याची टीका होत आहे.

प्रकरणाची तातडीने चौकशी करून शिक्षण विभागाने स्पष्ट खुलासा करावा, तसेच झालेल्या त्रुटींची दुरुस्ती करून उर्वरित जागा तत्काळ भराव्यात, अशी मागणी आहे. तसेच सुरू असलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत एसईबीसी आणि इडब्ल्यूडी प्रवर्गासाठी प्रत्येकी १० टक्के जागा भरण्याचे स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणी संबंधित मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. -एक पालक

या पार्श्वभूमीवर “एसईबीसी कोटा पूर्ण का भरला गेला नाही?” असा सवाल विविध स्तरांतून उपस्थित होत आहे. मराठा समाजातील सुमारे १ हजार ९७२ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट फटका बसल्याचा दावा करण्यात येत असून, संबंधित कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आम्ही कोणत्याही प्रवर्गाला धरून प्रवेश देत नाहीत. जे आर्थिक आणि दुर्लभ घटकातील विद्यार्थी असतील त्यांना आम्ही आरटीई मार्फत प्राधान्य देतो. फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड यादी वेगळ्या पद्धतीने केली जाते. – शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक)

हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा दिवसभर राहणार बंद

Web Title: Sebc quota has been violated in rte admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Students

संबंधित बातम्या

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन
1

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
2

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
3

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
4

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.