शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) व गुणपत्रिका (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना देताना कोणत्याही प्रकारची रक्कम आकारू नये, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य मंडळाकडे आवश्यक तांत्रिक सुविधा आणि नियंत्रण यंत्रणा उपलब्ध असल्याने अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
अकरावी प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येत असून, ऑफलाइन प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
PM Narendra Modi Delegative Level Talks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. वाचा याबाबत सविस्तर.
महानगरपालिकेच्या शाळांमधील यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.
वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतर सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल.
उच्च शिक्षण यांच्या कार्यालयाद्वारे संबंधित महाविद्यालयास सदर रक्कम फी भरल्याच्या दिनांकापासून ६ टक्के व्याजदराने संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्याच्या बहुजन कल्याण विभागाच्या २०२६-२७ परदेशी शिष्यवृत्ती जाहिरातीत ७५ पैकी २५ जागा अभियांत्रिकीसाठी राखीव ठेवल्याने इतर शाखांतील ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची टीका होत आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत तळवडे येथील सरस्वती युनिव्हर्सिटी नॅशनल स्कूल (एसव्हीव्हीएनएस)च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
सीबीएसई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये फिजिक्सवाला संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभर उल्लेखनीय यश मिळवले असून, तिघांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, संपर्क क्रमांक किंवा माहिती केंद्र उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी मुकुंद किर्दत यांनी केली.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी पूर्वी नागपूर येथेच व्यवस्था होती. यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील सात ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र या बदलानंतरही प्रक्रिया वेगाने न होता विलंब वाढल्याची तक्रार आहे.
शिक्षणाचा अधिकार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया २०२६ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) कोट्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
या सीईटी परीक्षेसाठी दुसऱ्या संधीसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुपारच्या सत्रात पीसीएम समूहाच्या या सीईटी परीक्षेमध्ये २९ हजार ८९७ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ७४३ विद्यार्थी उपस्थित होते. सीईटी परीक्षा ९६.१४ टक्के विद्यार्थ्यानी दिली.