Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डाची स्थापना! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय

शाळांमधील मुलांमध्ये वाढणाऱ्या मधुमेहाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने सर्व शाळांमध्ये 'शुगर बोर्ड' लावण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2025 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लहान वयातच मुलांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. वाढत्या साखर सेवनामुळे लठ्ठपणा, अल्पवयीन मधुमेह, तसेच इतर अनेक आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, सर्व शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ लावण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये साखरेच्या अति सेवनाचे दुष्परिणाम जाणवून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळविणे हा आहे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये इंडक्शन प्रोग्रामद्वारे नवे शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू

या निर्णयामागे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची शिफारस आहे, ज्याच्या आधारे याआधी काही सीबीएसई शाळांमध्ये हे पथदर्शी उपक्रम राबवण्यात आले होते. आता हा उपक्रम राज्य मंडळाच्या शाळांमध्येही लागू करण्यात येणार आहे. शुगर बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजच्या आहारातील साखरेचे प्रमाण, जंक फूड, शीतपेये, बिस्किटं, चॉकलेट्स इत्यादी पाकिटबंद पदार्थांमधील साखरेचे प्रमाण, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, आणि साखरेला पर्याय असणाऱ्या आरोग्यदायी पदार्थांची माहिती देण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून, त्यासाठी डॉक्टरांची मदत घेण्यात येईल. यासोबतच आहारतज्ज्ञ विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व आणि साखरेपासून होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन देतील. मुलांच्या दैनंदिन दिनक्रमात व्यायामाचा समावेश होण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज व्यायाम सत्र घेण्यात येणार आहेत.

या निर्णयाचे अनेक पातळ्यांवर स्वागत होत आहे. आजच्या काळात लहान वयातच मुलं चिप्स, शीतपेय, पॅकेज्ड स्नॅक्स अशा पदार्थांच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अनियंत्रित होत आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. शाळा हा मुलांचा दुसरा घर असतो, त्यामुळे अशा उपक्रमाची सुरूवात शाळेतूनच होणे अत्यंत योग्य ठरते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये वाधवानी इग्नाइट बूटकॅम्प; आशियात विक्रमी विद्यार्थी उपक्रमांची नोंद

एकूणच, ‘शुगर बोर्ड’सारखा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. हे पाऊल पुढे जाऊन एक आरोग्यदायी आणि जबाबदार पिढी घडविण्यास हातभार लावेल, यात शंका नाही.

Web Title: Sugar board to be established in schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • education news
  • School

संबंधित बातम्या

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास
1

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त
2

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त

Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह’, परिवर्तनाने एकजूट आणि धाडसाने बालविवाहाचा अंत
3

Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह’, परिवर्तनाने एकजूट आणि धाडसाने बालविवाहाचा अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.