
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
26 मार्च रोजी सकाळी 09.40 वाजता फिर्यादी गोपाल भटकर यांना त्यांचा पुतण्या स्वप्नील भटकर याने फोन करून ‘संजय काका मरण पावले आहेत’ अशी माहिती दिली. माहिती मिळताच गोपाल भटकर तातडीने वाई गावात पोहोचले, तेव्हा त्यांना 50 वर्षीय संजय रामकृष्ण भटकर यांचा मृतदेह घरामागील गोठ्यात आढळून आला.
Pune Crime: 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह नवजात बाळाचा मृत्यू, मोबाईल डेटा डिलीट; संशय वाढला आणि…
सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत होता मात्र काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मर्ग (ADR) दाखल करून तपासाला सुरुवात केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय, मूर्तिजापूर येथे पाठवण्यात आला. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात हा मृत्य नैसर्गिक नसून गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झाला असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते.
पॉलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल
या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना घरातील सदस्यांवर संशय आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे वहिनी संगीता आणि पुतण्या स्वप्नील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
कशी केली हत्या?
26 मार्च रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरात मोठा वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या वहिनी संगीता विनोद भटकर (वय 48) आणि पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय 25) यांनी संजय भटकर यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला होता. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ans: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात.
Ans: गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.
Ans: मृत व्यक्तीची वहिनी आणि पुतण्या यांनी मिळून खून केला.