
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील आरोपींचा नाव रामादेवी आणि तिचा प्रियकर प्रसादम् गोपीसाई असे आहे. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव पुल्ला दुर्गा प्रसाद असे आहे. रामादेवी आणि गोपीसाईची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. ही ओळख प्रेमसंबंधात निर्माण झाली. या दोघांनी मार्च महिन्यात दुर्गा प्रसाद यांच्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या, ते बेशुद्ध झाल्यांनतर त्यांचा श्वास कोंडून हत्या करण्यात आली.
दुर्गा प्रसाद यांचा मृत्यू १३ मार्चला झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुर्गा प्रसाद यांच्यावर यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे नातेवाईकांना ही नैसर्गिक घटना असल्याचे वाटले आणि कोणालाही घातपाताचा संशय आला नाही. यामुळे अनेक महिने हा गुन्हा लपून राहिला.
कसा उघडकीस आला कट
मात्र काही महिन्यांनंतर पीडित कुटुंबाला या घटनेचा संपूर्ण तपशील असलेला एक मेसेज मिळाला. ज्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा रामादेवी आणि गोपीसाई यांचे प्रेमप्रकरण आणि त्यांनी रचलेला हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आला. पोलिसांनी सखोल चौकशीअंती या दोन्ही आरोपींना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…
‘माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल…’ १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?
तामिळनाडूतील मदुराई येथे पोलिसांकडून केलेल्या कथित छळानंतर २६ वर्षीय दलित तरुणाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. १०१ दिवस मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर बुधवारी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांनंतर, मदुराई येथील विद्युत स्मशानभूमीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे आता पोलिस जबाबदारी आणि मानवाधिकार उल्लंघनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Ans: रामादेवी आणि तिचा प्रियकर प्रसादम् गोपीसाई हे या प्रकरणातील आरोपी आहेत.
Ans: पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Ans: कुटुंबाला मिळालेल्या एका मेसेजमुळे संशय निर्माण झाला आणि तपासातून हत्येचा कट उघड झाला.