Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून विषबाधा; ६०० जण आजारी तर एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून जवळपास ६०० लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच मृत्यू झाला आहे तर १७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2025 | 08:44 AM
FOOD POISIONING(फोटो सौजन्य - PINTEREST)

FOOD POISIONING(फोटो सौजन्य - PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या अन्नातून जवळपास ६०० लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला असून १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्यात घडली आहे. विषबाधेचे नेमके कोणते कारण अजून स्पष्ट झाले नाही आहे.

Crime News: सांगवी पोलिसांची मोठी कारवाई! दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याप्रकरणी थेट…

नेमकं काय घडलं?

अंबाळा ठाकूरवाडी गावात शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा दुपारी ४:३० वाजता पार पडला. या सोहळ्याला अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर 32 ठाकरवाड्यातील वऱ्हाडी या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरु झाल्या. यात सर्वांनी जेवण केले आणि घरी परतले.

दुसऱ्या दिवशी (२६ एप्रिल) या सर्वानाच उलट्या, जुलाब,चक्कर येणे, पोटदुखी होऊ लागली. याविषबाधेमुळे सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या बालकाचा मृत्यू झाला आहे. संगीत मेंगाळ (वय २५, रा. अंबाळा) या महिलेसह १७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर कुरणखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी घटनास्थळी दाखल

सामूहिक लग्न सोहळ्यातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर घटनास्थळी पोहचले. तसेच उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, विषबाधेचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेण्यात येणार आहे.

JALGAON CRIME: जळगावात सैराटची पुनरावृत्ती; संतप्त वडिलांनी वर्षभरानंतर पोटच्या पोरींसह जावयावर केला गोळीबार

Web Title: Food poisoning at mass wedding 600 people sick one dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • food poisoning news
  • Wedding Season

संबंधित बातम्या

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
1

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…
2

Chhatrapati Sambhajinaga news: आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या, माफ करा! सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल, तुमच्या…

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास
3

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या ‘या’ जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, दुर्लक्ष केल्यास अवयव होतील निकामी
4

झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या ‘या’ जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, दुर्लक्ष केल्यास अवयव होतील निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.