भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई
मुंबई : शिवाजीनगर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीसी) मोठे यश मिळाले आहे. बनावट कागदपत्रांवर भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशींना एटीसीने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि एटीसी प्रमुख विक्रांत शिंदे यांनी हुसेन मोफिजुल शेख (वय २२), लिटन मोफिजुल शेख (वय २४), अन्सार अली सरदार (वय ४४), सुलेमान रहीम शेख (वय ३४) अशी चार स्थलांतरितांची ओळख पटवली.
ओळख लपवून मुंबईच्या विविध भागात मजूर म्हणून काम करत होता, असे उपनिरीक्षक विक्रांत शिंदे यांनी सांगितले. गोवंडीतील लोटस जंक्शन येथील जलेबी दुकानासमोर चार बांगलादेशी नागरिक येत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे, एटीसी सेलचे हवालदार निकम, शिंदे आणि पाटील यांनी सापळा रचला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी म्हटले की, ‘आतापर्यंत आम्ही 80 हून अधिक लोकांची पडताळणी केली आहे. आम्हाला संशय आहे की ते बांगलादेशी आहेत आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलिस येथे आणखी किती लोक लपले आहेत आणि त्यांना बेकायदेशीरपणे भारतात कोण आणत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत’.
वैध कागदपत्रे नाही
यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. वरील आरोपी, जो बांगलादेशी नागरिक आहे, त्याने बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. भारतात प्रवेश करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने ते भारत सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर भारतात राहत होते.
पुण्यात बांगलादेशातील नागरिकांची वाढती संख्या
पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना स्वारगेट परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे. महर्षीनगर भागात ही कारवाई केली असून, मध्यभागातूनच बांगलादेशीला पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे