
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
गेल्या काही दिवसांपासून शांताबाई या कोमात होत्या. त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाई यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले होते. मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही अशी भूमिका घेतली.
पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन
गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकाला मेडिकल सर्टिफिकेट मागणे किंवा बँकेचा कर्मचारी घरी पाठवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बँकेच्या कर्मचायांनी खातेदाराला त्यांनी शाखेत बोलावले. नाईलाजाने मुलीला आणि जावयाला गंभीर आजारी कोमात असलेल्या शांताबाई याना बँकेत घेऊन जावे लागले. अखेर आज ७० वर्षीय शांताबाई यांचे निधन झाले आहे. या प्रकरणानंतर गावकरी तीव्र संताप व्यक्त करत आहे. संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड
दुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पारंपरिक धान शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात आता नगदी फळपिकांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे यांनी यशस्वीपणे केलेली स्ट्रॉबेरी लागवड. गोमणी परिसरात प्रामुख्याने धान व पारंपरिक पिकांची शेती केली जाते. मात्र उत्पादनातील अनिश्चितता, वाढते खर्च आणि बाजारातील चढ उतार लक्षात घेत सुबेनराव यांनी पर्यायी नगदी पिकांचा विचार करून कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि प्लास्टिक मल्चिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला.
Ans: गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात.
Ans: खातेदार प्रत्यक्ष हजर नसल्यास पैसे न देण्याची शाखेची भूमिका.
Ans: महिलेचे निधन झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.