
आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न...
काय आहे प्रकरण?
एनडीटीवीच्या रिपोर्टनुसार, २०२४ साली सोशल मिडिया इन्फ्लुएंजर मानसी राजपूतचा विवाह सागर राजपूतसोबत लावण्यात आला होता. कानपूरमध्ये राहणारे दोघे पती-पत्नी सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय होते. इंस्टाग्रामवर मानसीचे ८ लाख फाॅलोवर्स आहेत. मानसीच्या कुटुंबाने दावा केला की, लग्नावेळी त्यांनी ७ लाख रक्कम आणि काही महागडे गिफ्टस भेट म्हणून दिल्या होत्या. परंतु इतकं सगळं करुनही सासरची मंडळी काही खुश नव्हती. कुटुंबातील काही सदस्य कारची मागणी करत होते ज्यासाठी मानसिला त्रासही देण्यात आला. कारची ही इच्छा पूर्ण न केल्याने मानसीची सासरच्यांकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
कधी झाला मृत्यू?
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी ३० मे रोजी त्यांना समजलं की मुलीने आत्महत्या केली आहे. परंतु कुटुंबाचा विश्वास आहे की, ही आत्महत्या नसून सासारच्यांनी मिळून केलेली हत्या आहे. मृत मानसीच्या कुटुंबाने दावा केली की, पैशांसाठी मानसीचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. मानसीने कथितरित्या तिला होणाऱ्या त्रासाची माहिती कुटुंबाला दिली होती ज्यानंतर प्रकरण सोडवण्यासाठी कुटुंब अनेक वेळा लखनौला गेले. पण अखेर याचा शेवट मृत्यूनेच झाला.
कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल
मानसीच्या कुटुंबाने खुन्याच्या आरोपाखाली पती सागर राजपूत, दीर अनु, नणंदा बरखा आणि चांदनी, आणि आत्या आशा अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोसिल पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा करत असून पती सागरला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे महिलांची सुरक्षा आणि हुंड्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
मागेच लखनाैमध्ये श्वेता सिंह हिच्याही मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. माहितीनुसार, हे प्रकरण देखील हुंडाबळीचेच प्रकरण होते. २८ वर्षीय नवविवाहित श्वेताचा ६ महिन्यांआधी शिवम सिंह याच्याशी विवाह झाला होता. श्वेताचा लखनाैमधील ठाकुरगंज परिसरात गूढ मृत्यू झाला. श्वेताच्या कुटुंबाने आरोप केला की. शिवम आणि त्याच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी श्वेताचा छळ केला जात होता. या प्रकरणात पती शिवमला ताब्यात घेण्यात आल असून पोलिसांचा तपास सुरु आहे.