
crime (फोटो सौजन्य: social media)
• चेतनच्या मित्रांच्या दाव्यानुसार, सिया आणि चेतन राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते.
• केतनचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून डेटा डिलीट झाल्याचा संशय आहे.
• पुणे पोलिसांकडून हत्या प्रकरणाचा तांत्रिक आणि डिजिटल तपास वेगाने सुरू आहे.
पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा पोलिसांचा संशय असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबतही नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, चेतनच्या जोधपूरमधील मित्रांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील राजस्थान कनेक्शन चर्चेत आले आहे.
चेतन हा मूळचा जोधपूरचा
मुख्य आरोपी चेतन चौधरी हा मूळचा जोधपूरजवळील पलासनी गावचा रहिवासी आहे. तो पुण्यात उच्च शिक्षणासाठी आला होता. चेतनचे वडील जोधपूरमध्ये एक किराणा दुकान चालवतात, तर या दुकानाच्या अगदी समोरच मुख्य आरोपी महिला सिया गोयलच्या वडिलांचे कार्यालय आहे. पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना चेतन क्रिकेट खेळायचा. याच दरम्यान त्याची ओळख सियाचा भाऊ साहिल याच्याशी झाली. साहिलच्या माध्यमातूनच चेतन आणि सिया एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
चेतनच्या मित्रांनी काय सांगितले
चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध इतके घट्ट होते की, ते एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले होते की, “आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहोत.” इतकेच नव्हे तर, चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. “लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून (कुटुंबाकडून) करेल,” असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता.
सियाने केतनच्या फोनमधून डेटा डिलीट केला?
दरम्यान, केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरत असून, केतनला दरीत ढकलल्यानंतर त्याचा मोबाईल सियाकडे कसा आला, याचा तपास पोलीस करत आहेत. केतनचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, कुटुंबीय लोहगडावर पोहोचण्यापूर्वी मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर सियाने मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली असून, फॉरेन्सिक अहवालातून डेटा डिलीट झाला का? याबाबत उलगडा होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ans: सिया आणि चेतन लग्नानंतर उदयपूर किंवा जोधपूरमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते, असा दावा मित्रांनी केला आहे.
Ans: कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
Ans: मोबाईलचा फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या हालचालींचा तपास यावर पोलिसांचा भर आहे.