
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
हातकणंगलेतील निवृत्त तहसीलदार श्रीपती चौगुले यांचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. 13 एप्रिल रोजी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असताना अघोरी विधी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी नारळ आणि इतर साहित्य वापरून अघोरी विधी केल्याचे दिसून आले. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अशा अंधश्रद्धाजन्य कृतींमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
’15 हजार रुपये द्या, नाहीतर पाहणी करून काम बेकायदेशीर दाखवू’; अपर जिल्हाधिकाऱ्यानेच मागितली लाच
सीसीटीव्हीची मागणी
या पार्श्वभूमीवर संबंधित अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच स्मशान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित देखरेख ठेवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर केली आहे. २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हत्या केल्यांनतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
काय नेमकं घडलं?
कोल्हापुरात २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी रात्री ही घटना घडली. वडील मारुती कुंडले आणि लागण भाऊ शीतल कुंडले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी संभाजी कुंडले यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाले.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनासस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला आहे. तर हत्या करणारा संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असून त्यानं 1999 ते 2000 मध्ये स्वतः च्या पत्नीला राॅकेल ओतून पेटवून मारलं होते त्यातून तो निर्दोष सुटला असून त्याच्या पत्नीची हत्येत सासूचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. अशातच आता या क्रुर मुलाने वडील आणि लहान भावाचा खून केल्याने हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट
Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे.
Ans: रक्षा विसर्जनाच्या वेळी हा प्रकार समोर आला.
Ans: दोषींवर कडक कारवाई आणि स्मशानात CCTV बसवण्याची मागणी.