Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: चिपळूणमध्ये हृदयद्रावक घटना! मुलं होत नसल्याच्या तणावातून विवाहितेची आत्महत्या

चिपळूण तालुक्यातील आकले गावात अपत्यप्राप्ती न झाल्याच्या मानसिक तणावातून 27 वर्षीय विवाहित जयश्री मोहिते यांनी उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 01:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अपत्यप्राप्ती न झाल्याने मानसिक तणावात आत्महत्या
  • उंदीर मारण्याचं औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज
  • उपचारादरम्यान जयश्री मोहिते यांचा मृत्यू
रत्नागिरी: रत्नागिरी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने मुलं होत नसल्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव जयश्री विजय मोहिते (वय 27, रा. आकले) असे आहे. ही घटना रत्नागिरी येथील चिपळूण तालुक्यातील आकले गावात घडली आहे.

काय घडलं नेमकं?

जयश्री मोहिते यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर बराच काळ उलटूनही त्यांना मुलं होत नव्हते. याच कारणामुळे त्या मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचे त्यांचा जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या अधिकच शांत, चिंतेत आणि अस्वस्थ दिसत होत्या, अशी माहितीही समोर आली आहे.

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह

गुरुवारी सकाळच्या सुमारास जयश्री यांनी उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं. काही काळानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. कुटुंबियांच्या लक्षात येताच तातडीने त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने मोहिते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, जयश्री मोहिते यांच्या पश्चात पती, सासरची मंडळी आणि माहेरचे कुटुंबीय असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच अलोरे- शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जयश्री यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी; तब्बल 181 किलो ड्रग्स केले नष्ट

रत्नागिरी जिल्ह्यात आहे गेल्या काही वर्षापासून अमली पदार्थांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात इक्ला आहे. त्यामुळे तरुण पिढी चे मोठे नुकसान होत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या २०२० ते २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेले सुमारे १८१ किलो एवढे विविध अमलीपदार्थ न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे येथील रांजणगाव येथे जाळून नष्ट केले. एनडीपीएस ऍक्ट १९८५ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २०२० ते २०२५ या कालावधीमध्ये अमली पदाथांच्या संदर्भातील एकूण ६५ एनडीपीएस गुन्हे दाखल झाले होते.

या गुन्ह्यामध्ये तब्बल १८१ किलो अमलीपदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी जप्त केलेल्या हा अमली पदार्थाचा ऐवज नष्ट करण्याचे आदेश सर्वच जिल्ह्याच्या पोलिस दलाना दिले होते. त्यानुसार पुणे येथील रांजणगाव येथे न्यायालयाच्या प्राप्त आदेशानुसार हे अमली पदार्थ शुक्रवारी जाळून नष्ट करण्यात आले आहेत.

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विवाहितेचं नाव काय आहे?

    Ans: जयश्री विजय मोहिते (वय 27).

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय?

    Ans: अपत्यप्राप्ती न झाल्याने आलेला मानसिक तणाव.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

Web Title: Ratnagiri news a married woman commits suicide due to the stress of not being able to have children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Local Body Election : गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट
1

Local Body Election : गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट

New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…
2

New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…
3

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…

Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
4

Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.