
crime ( फोटो सौजन्य - social media)
Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…
काय घडलं नेमकं?
करूळ धरणात अंघोळीसाठी म्हणून पाच मुली गेल्या होत्या. त्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघे बचावले. या घटनेची माहिती मिळताच करूळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले. त्यांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने खळबळ उडाली असून मृत्यू झालेल्या तिघी शाळकरी मुली होत्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेला जमीचा वाद अचानक रक्तरंजित हल्ल्यात बदलला. एका ६५ वर्षीय महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरस्वती सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील ओवलीये-मधलीवाडी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे.
ओवलीये येथील सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरु होता. शनिवारी सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथसोबत घराशेजारील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली.
सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या विजय आणि रघुनाथ या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, सरस्वती या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हे बघून एकनाथ सावंत हा हादरून गेला.
75 टक्के गुण मिळूनही दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; घरी कोणी नसल्याची संधी साधली अन्…
Ans: ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली.
Ans: करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला.
Ans: दोन मुलींना वाचवण्यात यश आले.