
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सच्चाराम गुप्ता असे आहे. सच्चाराम गुप्तता यांना दोन मुले आहेत. त्यांची मोठी सून शोभा हिची मागणी होती की सासऱ्याने सगळी संपत्ती तिच्या नावावर करावी. मात्र सच्चाराम यांना आपल्या दोन्ही मुलांना संपत्तीचा समान वाटा द्यायचा होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होता आणि हे प्रकरण दिवाणी न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. तरीही वाद काही मिटला नाही. यामुळे सुनेने आपल्या सासऱ्यांची हत्या करण्याचं ठरवलं.
कशी केली हत्या?
सुनेने सासऱ्यांना वाटाघाटीच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. गप्पा मारत असतांना हा वाद विकोपाला गेला. शोभाने सासऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, ज्यामुळे ते वेदनेने जमिनीवर कोसळले. त्यांनतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या रमेश गुप्ता आणि धनई यादव या कथित डॉक्टराने त्यांना पकडून ठेवले, तर शोभाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सासऱ्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सच्चाराम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीकांत चौहान नावाच्या व्यक्तीला बोलावून मृतदेहाचा चेहरा कपड्याने बांधण्यात आला आणि रात्रीच्या वेळी तो शेजारच्या रिकाम्या भूखंडात फेकून देण्यात आला.
आरोपी अटकेत
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी केवळ चार तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. हत्येत वापरलेला लाकडी दांडा आणि इतर महत्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या सर्व आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Ans: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात.
Ans: संपत्तीच्या वाटपावरून सुरू असलेला वाद.
Ans: मुख्य आरोपी सुनेसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली.