Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातून नेमका पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेते मोठं वक्तव्य केलं.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2024 | 12:33 PM
“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही.”, मनोज जरांगेंच्या टीकेला CM फडणवीसांचं प्रत्युत्तर

“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही.”, मनोज जरांगेंच्या टीकेला CM फडणवीसांचं प्रत्युत्तर

Follow Us
Close
Follow Us:

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करतानाच मुंबई महापालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. या तयारीची झलक ऐन दिवाळीत दिसली. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि प्रदीर्घ काळ पालिका काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसमधील सर्व प्रमुख पदांचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रिय अस्मितेला भाजपचं समर्थन राहिलं आहे. पण त्यासोबत राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचा स्वीकार व्हावा. ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजे हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बोलणी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा: मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार

काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात

रवी राजा यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात येत असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. लवकरच ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मला नाव विचारू नका, पण येत्या काही दिवसांत काँग्रेसचे नेते आमच्यासोबत येतील.

रवी राजा हे सायनमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाने संधी नाकारल्यामुळेच रवी राजा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. रवी राजा हे मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते होते. काँग्रेसने सायन (शिव) मधून गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा नाराज झाले. रवी राजा हे सायनमधून (शीव) पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर पाच वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करताच रवी राजा यांच्यावर मोठी जबाबदारी

काँग्रेसचे माजी नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच रवी राजा यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी सांगितले.

रवी राजांच्या पक्षप्रवेशावर काय म्हणाले?

रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी पालिका गाजवली, मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते, पाच टर्म नगरपालिका निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावावर आहे, त्यांनी 23 वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून काम केले. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितलं जातं. जनसंपर्क असलेला नेता. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. आम्हाला रवी राजा यांचा फायदा होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा: “मी शपथ घेतो की मी देशाची एकता…,” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी केवडियात, एकतेची दिली शपथ

रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात त्यांच्या संपर्कातून काँग्रेसचे दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करतील. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेल. पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी रवी राजा आहे. रवी राजा यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. सायनमध्ये त्यांचं काम मोठं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार तमिल सेल्वन यांना फायदाच होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणाले.

Web Title: Devendra fadnavis says mahayuti will form government in maharashtra assembly polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
3

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द
4

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.