
फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी 6 रोज नवनवीन वळणे घेत आहे. या वळणावर अनेक अनपेक्षित गोष्टी घडत आहेत, याचा विचारही करणे कुणाला जमले नसेल पण हा एक खेळ आहे! येथे कालचे शत्रू आज मित्र होतात आणि आजचे जिवलग… कट्टर दुश्मन! असेच काही आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. बिग बॉसने सोशल मीडियावर अनेक प्रोमो शेअर केले आहेत, त्यातील एका प्रोमोमध्ये टोळी तुटली का? असा प्रश्न निर्माण होत आहे कारण खुद्द अनुश्रीने म्हंटले आहे की “मी आता टोळी सोडतेय…”
नक्की काय घडलं प्रोमोमध्ये?
प्रोमोमध्ये विशाल आणि अनुश्रीमध्ये मोठा वाद झालेला दिसून येत आहे. अनुश्रीने टोळीच्या गॅंगला म्हंटले आहे की, “तुम्ही एकदा म्हणत होता की मला अनुश्री टोळीमध्ये नकोय. रोज सगळ्यांची काळजी घ्या. सगळ्यांसाठी करते मी स्वतः efforts घेते पण कुणी माझ्यासाठी काही करत नाही.” तेव्हा विशाल म्हणतो की “मी तुझ्यासारखा ड्रामा नाही करत.” त्याचक्षणी अनुश्री टोळी सोडण्याचा निर्णय घेते आणि म्हणते की “मी टोळी सोडतेय.” तेव्हा विशाल भडकून तिला म्हणतो की “तुला नाही ठेवत गं!” अनुश्री म्हणते की “मला राहायचंही नाहीये. याची हांजीहांजी करण्यासाठी आलोय का आम्ही इथे?”