
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
बादशाह आणि ईशाने सोमवारी रात्री सोशल मीडिया स्टोरी शेअर करत स्पष्ट केलं की, त्यांनी परस्पर संमतीने आणि एकमेकांचा आदर राखत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
बादशाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हा निर्णय एकमेकांचा आदर ठेवून घेतला आहे. या कठीण काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो.”
पुढे त्याने लिहिलं, “या विषयावर ही आमची एकमेव प्रतिक्रिया असेल. आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज लावू नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे.”
जुलै महिन्यात बादशाह आणि ईशाच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. त्यावेळी ईशाने बादशाहसोबतचे फोटो आणि व्हिडीओ असलेला एक व्हिडीओ मॉन्टेज शेअर केला होता. मात्र, या पोस्टच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं.
ईशाने पोस्टसोबत लिहिलं होतं, “प्रत्येक वादळ एक धडा असतो, प्रत्येक प्रार्थना एक आशा असते.” तिच्या या पोस्टनंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या.
(फोटो सौजन्य -बादशाह, ईशा रिखी)
बादशाह आणि ईशा यांनी याच वर्षी मार्च महिन्यात एका खासगी समारंभात लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती त्यांनी स्वतः जाहीर केली नव्हती. ईशाच्या आईने लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली.
यानंतर जून महिन्यात इंस्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनदरम्यान ईशाने बादशाहसोबतच्या लग्नाची कबुली दिली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर