
फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी ६ मध्ये आता बदलीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत एक असणारी टोळीत फूट पडू लागली आहे. अनुश्रीने टोळीची साथ सोडली आहे. अशामध्ये टोळीतुन टोळीचा आणखीन एक सदस्य कमी झाला आहे. कालच्या Eviction मध्ये रोशन भजनकर खेळातून बाहेर झाला आहे. टोळीत आता फक्त विशाल आणि रुचिता उरले आहेत. पण आयुषने एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्याला रुचिताबद्दल काय वाटतं? त्याचे रुचिताबद्दल काय विचार आहेत? याबद्दल त्याने विधान केले आहेत.
रुचिताबद्दल काय म्हणाला आयुष संजीव?
आयुष कौतुकीच्या भाषेत रुचिताच्या चुका त्याने सांगितल्या आहेत. तो विधान करतो की, “रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता बिलकुल आहे. ती चुकाही नवीन करते, त्याचत्याच नाही. पण तिला शिस्त, इतरांचा आदर करणे आणि बोलण्याची पद्धत शिकण्याची फार गरज आहे. तिला मतं आहेत आणि ती मतं मांडते सुद्धा! पण मध्येच असं काही तरी करते की स्वतःच एक मुद्दा बनून जाते. तिने या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, स्वतःवर काम केलं पाहिजे नाही तर लोकं संधीसाधून सर्वात आधी तिला घराच्या बाहेर काढतील.” हे सगळं म्हणताना आयुष म्हणतो की “रुचिता खरी आहे. त्या घरात जे लोकं आपले खरं व्यक्तिमत्व जगासमोर दाखवतात त्यापैकी एक रुचिता हे नाव आहे.”
तीन नव्या सदस्यांची घरात होणार Entry!
कालच्या भागात स्वतः रितेश म्हणाला होता की रविवारच्या भागात नवीन धक्का मिळणार आहे कारण कुणी तरी घरात येण्याची चाहूल लागली आहे. त्यांनतर बिग बॉसने सोशल मीडियावर एक प्रोमोही शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात तीन नवीन पाहुणे येणार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये संस्कृती साळुंखे, रेवा कौरसे आणि अभिनेता संकेत पाठक याचा समावेश आहे. या तीन नव्या Wild Card च्या एन्ट्रीने घरात काय माहौल होणार? कसे वातावरण असणार? या सगळ्या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी हा खेळ पाहणेही तितकेच गरजेचे आहे.