
फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, प्रवीणचं आणखीन एक वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. तो म्हणाला आहे की, “माझा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट कितीही मोठा यशस्वी झाला, तरी त्याने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा विक्रम मोडू नये, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे.” एकंदरीत, रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा ‘राजा शिवाजी’ सध्या मराठी सिनेविश्वातील Highest Grossing सिनेमा आहे.
प्रवीण सांगतो की त्याच्या सिनेमाच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी त्याला रितेश देशमुखने कॉल केला. तेव्हा रितेश म्हणाला की, “आज तुम्ही माझ्या सिनेमाला मागे टाकले. उद्या दुसरा कुणी तुमच्या सिनेमाला मागे टाकेल. परवा तिसरा कुणी येऊन त्याच्या सिनेमाला मागे टाकेल. आपण अशीच स्पर्धा करूयात आणि मराठी सिनेविश्वाला पुढे नेऊयात.” त्यावर मुलाखतीत प्रवीण सांगतो की, “रितेश देशमुख असो, नागराज मंजुळे असो किंवा मी स्वतः असो, आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे मराठी सिनेमा अधिकाधिक मोठा व्हावा.”
“मात्र, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ‘राजा शिवाजी’ किंवा ‘सैराट’ यांसारख्या चित्रपटांच्या पाठीशी मोठे चॅनेल आणि सक्षम मार्केटिंग टीम होती. पण ‘देऊळ बंद २’ च्या मागे अशा प्रकारचा कोणताही मोठा पाठिंबा नव्हता. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रेमामुळे पुढे जात आहे” असे प्रवीणने मुलाखतीत सांगितले.