
फोटो सौजन्य - Social Media
चित्रपटातील ‘मार तू शिक्का’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. या गाण्याच्या प्रदर्शनावेळी Sapna Choudhary हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत उपस्थितांची दाद मिळवली. सुशील राठोड, विनायक पवार आणि दीपक अंगेवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून नितीन सावंत आणि अंबरीश यांनी संगीत दिले आहे. तर Anand Shinde, अंबरीश आणि Vaishali Mhade यांनी हे गाणे आपल्या आवाजात सादर केले आहे. चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे गाणेही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. हे गीत Guru Thakur यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत यांनी दिले आहे. Ajay Gogavale यांच्या आवाजातील हे भावनिक गाणे चित्रपटाच्या कथेला अधिक ताकद देणारे ठरत असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच नृत्यांगना Gautami Patil हिच्यावर चित्रित झालेले ‘छम्मो’ हे गाणेही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिले असून साक्षी होळकर आणि Raja Hasan यांनी ते गायले आहे.
याशिवाय ‘कती तू बंजारा’ हे गाणे डॉ. गीतकुमार पवार यांनी लिहिले असून शालिनी राठोड आणि Raja Hasan यांनी ते सादर केले आहे. तर Sunny Leone हिच्यावर चित्रित झालेल्या ‘शांताबाई’ या गाण्यानेही कार्यक्रमात चांगलीच चर्चा रंगवली. संजय लोंढे यांच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. या भव्य सोहळ्याला Usha Nadkarni, Sayaji Shinde, Nagesh Bhosale, मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeevkumar Rathod यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून चित्रपटामागील भूमिका स्पष्ट केली. अभिनेत्री Usha Nadkarni यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल आणि काम करतानाच्या अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त केले.
चित्रपटाच्या संगीतामध्ये वास्तववादी भावनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रत्येक गाण्यामधून समाजातील संघर्ष आणि वेदना अधोरेखित करण्यात आल्या आहेत. संगीतकार नितीन सावंत, अजित, संजय लोंढे, सिद्धार्थ कश्यप आणि डॉ. गीतकुमार पवार यांनी संगीताच्या माध्यमातून कथेला अधिक प्रभावी रूप दिले आहे. कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स, गायकांची उपस्थिती आणि गाण्यांमधील सामाजिक वास्तवामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा म्युझिक लॉन्च सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या २९ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.