
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
विकी लालवाणी यांना दिलेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, “जेव्हा ती परत आली, तेव्हा मला आठवतंय की ती स्टारडस्टच्या ऑफिसमध्ये बसून झेरॉक्स मशीन वापरत होती आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुलाखती देत होती, की त्यांना अजूनही तिला मारायचं आहे. मला हेही आठवतंय की परवीन फक्त अंडीच खायची, कारण तिला वाटायचं की इंडस्ट्रीने बाकी सर्व गोष्टींमध्ये विष कालवलं आहे.”
परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘दीवार’ (१९७५), ‘अमर अकबर अँथनी’ (१९७७), ‘काला पत्थर’ (१९७९), ‘शान’ (१९८०) आणि ‘नमक हलाल’ (१९८२) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, परवीन बाबी यांना झटके येऊ लागले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि ते एक आंतरराष्ट्रीय गुंड असल्याचा आरोप केला. त्यांनी असाही आरोप केला की, बच्चन यांनी त्यांचे अपहरण केले होते आणि त्यांच्या कानात मायक्रोचिप बसवण्याचा प्रयत्न केला होता.
आधी गोशाळेत सेवा आणि आता थेट हिजाब? Ankita Lokhande चा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप
जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा असे उघड झाले की परवीन बॉबी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्या प्रेमसंबंधांच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, दोघांनीही या अफवांचे खंडन केले होते.
पूजाने मुलाखतीत पुढे सांगितले, “मला आठवतंय, माझे वडील मला तिच्या घरी घेऊन गेले होते. ती खूप सुंदर होती आणि माझ्यावर खूप प्रेम करायची. तिने मला ज्या प्रकारे परफ्यूम भेट दिला होता, ते मी कधीही विसरणार नाही. देणे हा तिचा स्वभावच होता.”
परवीन बाबी यांचे जानेवारी २००५ मध्ये निधन झाले. त्यावेळी त्या ५० वर्षांच्या होत्या. असे म्हटले जाते की, परवीन बाबी यांचा मृतदेह मुंबईच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागारात अनेक दिवस असाच पडून होता. ज्यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध असल्याची अफवा होती, त्यात महेश भट्ट यांनी पुढे येऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.