
फोट सौजन्य- सोशल मीडिया
एपिलेप्सीशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याकरिता अपस्मार जागरुकता आणि व्यवस्थापनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत ज्यामध्ये कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन ( CME )ने “एपिलेप्सी(अपस्मार) जागरुकतेविषयी झालेली प्रगती” या विषयावर लक्ष केंद्रित केले. डॉ. निर्मल सूर्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात एपिलेप्सी ग्रस्त वैद्यकीय तज्ज्ञ आणि जवळपास 300 व्यक्तींनी एकत्र येऊन एपिलेप्सी संदर्भात घ्यावयाची काळजी आणि उपचारातील आधुनिक पध्दतींवर चर्चा केली. या माध्यमातून एपिलेप्सी असलेल्या लोकांना सशक्त करणे आणि त्यांना या स्थितीबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘106 फ्री एपिलेप्सी कॅम्प इन महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे व्ही. वैद्यनाथन(व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, IDFC फर्स्ट बँक) तसेच प्रा. डॉ. संगीता रावत(डीन केईएम, हॉस्पिटल), अनिल सिंघवी (चेअरमन, आय कॅन इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर प्रा. लिमिटेड), डॉ. स्वाती लोढा संचालक(एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) आणि डॉ. निर्मल सूर्या(संस्थापक विश्वस्त आणि एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
एपिलेप्सी आजार
एपिलेप्सी(अपस्मार) हा मेंदूचा विकार आहे. यामध्ये अपस्माराचे झटके येणे, भान हरपणे, स्नायुंमधील ताठरता, श्वासोच्छवासास त्रास होणे, मूत्राशय आणि आतड्यांवरील नियंत्रण कमी होणे,दुखापत होणे, डोळे मिचकावणे किंवा ओठ फाटणे अशी लक्षणे आढळून येतात. मेंदूचे नुकसान, स्ट्रोक, मेंदूला झालेली गंभीर दुखापत, मेंदुज्वर, एन्सेफलायटीस सारखी अनुवांशिक स्थिती आणि मेंदूतील गाठ ही प्रमुख कारणे आहेत. अपस्माराने ग्रस्त लाखो लोक आहेत जे या आजाराशी अनेक लढा देत आहेत. लोक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याऐवजी जादुटोण्यासारख्या उपचार पर्यायांची निवड करतात. भारतातील उपचारांमधील आकडेवारी पाहता ७०-८०% रुग्ण उपचार करत नाहीत,ग्रामीण भागात निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येकाला या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबद्दल माहिती देण्यासाठी एक CME उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. निर्मल सूर्या(संस्थापक विश्वस्त आणि एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष) यांनी दिली.
वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि प्रभावी उपचार
डॉ. निर्मल सूर्या पुढे सांगतात की, उपचारांमधील आधुनिकता या विषयावरील सीएमई सत्र हे सहभागींसाठी डोळे उघडणारे होते, त्यामुळे या गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत उपचारांचा मार्ग स्पष्ट झाला. वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती ही आणखी प्रभावी उपचार पुरविते. आजच्या युगात एपिलेप्सी हा कलंक राहिलेला नाही आणि त्वरित उपचार केल्यास प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकते. या उपक्रमास पाठिंबा देत वैद्यनाथन यांनी एपिलेप्सी फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली आणि 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. एपिलेप्सी असलेल्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी भविष्यात असे आणखी उपक्रम राबविले जातील.