Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

एसआयआर 'वरून काँग्रेस सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. एसआयआरच्या नावाखाली मतदर यादीत फेरफार करण्यासाठी सत्ताधारी भाजपशी संगनमत करत असल्याचा आरोप करत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 17, 2025 | 09:56 AM
Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi Voter Rights Yatra: लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी गेल्या आवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे फक्त आरोपच नाही तर त्यांनी मतचोरीचे अनेक पुरावेही सादर केले. त्यांच्या आरोपांमुळे देशात एकच वातावरण तापल आहे. तर दुसरीकडे बिराहमधील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी विशेष सघन पुर्नपडताळणी (SIR) सुरू आहे. या एसआयआर’वरही राहुल गांधींनी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाच्या मतचोरीविरोधात आणि बिहारमधील एसआयआर विरोधात राहुल गांधीची आजपासून (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू करणार आहेत. ही यात्रा १३०० किलोमीटरची असेल. या यात्रेत काँग्रेस नेत्यांसोबत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव देखील सहभागी होणार आहेत.

इंडिया आघाडीच्या बॅनरखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रवासात तेजस्वी यादव यांच्यसह देशभरातील विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी होणार आहेत. १ सप्टेंबर २०२५ रोजी बिहारची राजधानी पटना येथे या यात्रेचा समारोप होईल. ही यात्रा लोकशाहीच्या आत्म्याच्या रक्षणातील निर्णायक लढाई असेल, असे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. या १६ दिवसांच्या प्रवासात राहुल गांधी मुंगेर, कटिहार, पूर्णिया, सुपौल, सीतामढी आणि दरभंगा यासह २३ जिल्ह्यांचा प्रवास करणार असून याठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहे.

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव

राहुल गांधी यांचा बिहारमधील  १३०० किमीचा प्रवास

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यात्रेचा आराखडा सादर केला. ” राहुल गांधी यांची ‘मतदार हक्क यात्रा’ बिहारमधील १,३०० किमीची असेल, जी महत्त्वाच्या मतदारसंघांमधून जाईल आणि ज्या भागात मतदानाचा अधिकार वंचित ठेवण्याचे आरोप सर्वात गंभीर आहेत अशा ठिकाणी जनतेचा पाठिंबा मिळवेल. ही केवळ एक यात्रा नाही. ही एक जनआंदोलन आहे. मतदार हक्क यात्रा लोकशाहीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल. गरीब, दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक आणि उपेक्षित नागरिकांचा आवाज दाबण्याच्या सुनियोजित कटाचा हा निषेध आहे.

एसआयआरवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्ला

एसआयआर ‘वरून काँग्रेस सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. एसआयआरच्या नावाखाली मतदर यादीत फेरफार करण्यासाठी सत्ताधारी भाजपशी संगनमत करत असल्याचा आरोप करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या हस्तक्षेपाचा हवाला देत खेडा म्हणाले की, न्यायालयीन दबावानंतरच निवडणूक आयोगाने विरोधी पक्ष आणि नागरी समाजाने उपस्थित केलेल्या विसंगतींची चौकशी करण्यास सहमती दर्शविली.

 

Web Title: 16 days 23 districts 1300 km rahul gandhi begins voter rights yatra in bihar from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • bihar
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
2

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ
3

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
4

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.