
'आम्ही मैदान सोडणार नाही,' धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही अभिजित दीपकेंची मोठी घोषणा; सरकारसमोर तीन नव्या मागण्या
अखेर तब्बल 35 दिवसांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांनी मोठा जल्लोष साजरा केला. मात्र अभिजित दीपकेंकडून आता मोठी घोषणा करण्यात आली असून त्यांनी आता सरकारसमोर तीन नव्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘आम्ही मैदान सोडणार नाही,’ असा आवाहन त्यांनी केले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा विस्तार झाला. अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.
यावेळी CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना संबोधित करत, “We Have Done It… या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण आपण ते करून दाखवलं,” असे म्हणत सर्व आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि हा विजय त्यांना समर्पित असल्याचे सांगितले.
मात्र, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपणार नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारसमोर आणखी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. अभिजीत दिपके म्हणाले, “आमची प्रमुख मागणी मान्य झाली असली तरी इतर दोन मागण्यादेखील मान्य करण्याचे सरकारने मान्य केलं आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. नीट परीक्षेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, यादोन मागण्यादेखील मान्य झाल्या पाहिजेत. अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत ट्विटर एक्सवरून प्रतिक्रीया दिली आहे. लोकशाही बोलण्याची भिती नसावी, त्यामुळे घाबरू नका, यांना लाईनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. हेजे स्वत:ला बादशाह समजू लागले आहेत, ते आपल्यामुळे…”
“There’s no need to be afraid. This is democracy. He has resigned, but we have two more demands. We won’t go like this. Dharmendra Pradhan has resigned. But the families of the children who committed suicide should receive compensation of one crore rupees. They should get it. One… pic.twitter.com/N8cT0DFAPH — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 25, 2026
“आमच्या अजून दोन मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाा तर झाला पण ज्यां मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत मिळालीच पाहिजे. दुसरे २० तारखेच्या मार्चमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या हकरती केल्या त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे. डिसीपी संदिप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि मोदींच्या नावाखाली ज्या लाठ्या चालवल्यात, यांनी लक्षात ठेवा एक राजीनामा झालाय, आता कॉकरोच सोबत पंगा घेऊ नका. जर आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो तर तुम्ही काय आहात?”
“यादेशातील विद्यार्थ्यांनी खुप हिमतीचे काम केलं आहे. २० तारीख आणि २० तारखेनंतर ज्या ज्या मुलांवर केसेस दाखल केल्या आहेत, त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेतले जावेत,” असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दीपके म्हणाले, “राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपलं, असं कोणी समजू नये. आम्ही मैदान सोडणार नाही.”
त्यांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या: