Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Ditwah : श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘दितवाह’ सरकतोय दक्षिण भारताकडे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु

सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. चक्रीवादळ डिटवा दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 07:35 AM
श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर आता 'डिटवा' सरकतोय दक्षिण भारताकडे

श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर आता 'डिटवा' सरकतोय दक्षिण भारताकडे

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर चक्रीवादळ दितवाह आता भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर वेगाने येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज सकाळी (दि.३०) हे वादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, असा अंदाज आहे.

सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. चक्रीवादळ दितवाह दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. श्रीलंकेतील विध्वंसानंतर, भारत रेड अलर्टवर आहे. या वादळामुळे शेजारच्या श्रीलंकेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तितकेच लोक बेपत्ता आहेत. चक्रीवादळ दितवाह आता भारताच्या दक्षिण किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत ते तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी ही या वादळाने सर्वाधिक प्रभावित झालेली राज्ये आहेत.

हेदेखील वाचा : Pune Weather News: पुण्यातून थंडी गायब! शहरातील तापमानात चढउतार; कोकणात पावसाचा अंदाज

आंध्र प्रदेश, तामिळनाडूत वादळ येणार

ताज्या माहितीनुसार, चक्रीवादळ दितवाह तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पोहोचले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ उत्तर-वायव्येकडे सरकत आहे आणि रविवारी पहाटे नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्यापूर्वी उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना ओलांडेल.

35 हून अधिक उड्डाणे रद्द, गाड्या प्रभावित

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नई विमानतळावर ३५ हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक देखील प्रभावित झाले आहेत. तामिळनाडूतील रामनाथपुरम आणि नागपट्टिनम जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाल्याचे वृत्त आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत कमीत कमी व्यत्यय आणण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी तयारीचा आढावा घेतला.

तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट

तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, दितवाह किनाऱ्याजवळून जाईल, रविवारी सकाळी ५० किलोमीटर अंतरावर आणि रविवारी संध्याकाळपर्यंत २५ किलोमीटर अंतरावर किनारपट्टी ओलांडेल. या वादळाबाबत हवामान विभागाने ३० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ते उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Web Title: After wreaking havoc in sri lanka ditwah cyclone is now moving towards south india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 07:27 AM

Topics:  

  • Climate Change
  • weather news

संबंधित बातम्या

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर
1

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान
2

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.