Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : काँग्रेसचे नामांतर करुन पाकिस्तानस्थित पक्ष करावे… शहजाद पूनावाला काँग्रेसवर का भडकले?

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनी निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 28, 2025 | 05:13 PM
BJP aggressive over Congress Vijay Wadettiwar controversial statement on Pahalgam victims

BJP aggressive over Congress Vijay Wadettiwar controversial statement on Pahalgam victims

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारण्याबाबत संशय व्यक्त केला आहे. यावरुन आता भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली आहे. वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी  आता काँग्रेसचे नाव बदलून पाकिस्तान बेस्ड पार्टी केले पाहिजे, अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, एकीकडे राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाविरुद्ध कारवाईची मागणी करतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते हिंदू पीडितांची थट्टा करतात. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की पीडित खोटे बोलत होते का? त्यांनी काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांवरही हल्ला चढवला आणि म्हणाले, “काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय धोरणावर वर्चस्व गाजवण्याची परवानगी दिली आहे. वडेट्टीवार हे तेच नेते आहेत ज्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानला क्लीन चिट दिली होती. पाकिस्तानबद्दल काँग्रेस किती उदारता दाखवेल?” असा आक्रमक सवाल शहजाद पूनावाला यांनी उपस्थित केला आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

पूनावाला यांनी व्हिडिओ केला जारी

एका व्हिडिओमध्ये, शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे की काँग्रेस नेते पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी सतत स्पर्धा करत आहेत. ते म्हणाले की, “आधी राष्ट्रवादी-शरद पवार गटातील अनिल देशमुख यांनी पाकिस्तानबद्दल विधान केले आणि आता विजय वडेट्टीवार म्हणतात की पाकिस्तान नव्हे तर सरकार जबाबदार आहे. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचा काही पुरावा आहे का?” असा सवाल त्यांनी विचारला.

मुख्तार अब्बास नक्वी यांनीही काँग्रेसवर टीका केली

भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही काँग्रेसवर टीका केली आणि म्हणाले, “काही लोक पाकिस्तानचे प्रॉक्सी भागीदार बनण्यासाठी स्पर्धा करत आहेत. हे त्यांच्या हिताचे नाही आणि देशाच्या हिताचेही नाही. जेव्हा संपूर्ण देश एकजुटीने पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी करत आहे, तेव्हा ते कोणत्या प्रकारच्या राजकीय युक्त्या खेळत आहेत?”

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पीडितांच्या बोलण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की,  “हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जान त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,”

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “जर सरकार युद्धासाठी तयार असेल तर त्यांनी लढावे, फक्त बोलून काहीही होणार नाही. ते पाकिस्तानचे पाणी थांबवण्याबद्दल बोलतात, पण त्यासाठी २० वर्षे लागतील.पहलगाममध्ये, काश्मीर खो-यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारलं. हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?”

Web Title: Bjp aggressive over congress vijay wadettiwar controversial statement on pahalgam victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Congress
  • Pahalgam Terrorist Attack
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
1

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी
2

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी

‘लाडकी बहीण योजना बंद होणार’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान
3

‘लाडकी बहीण योजना बंद होणार’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा
4

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.