राज्य कर्जात बुडाले आहे. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कापूस खरेदीसाठी सरकारजवळ पैसा नाही. मात्र, महायुती सरकारमधील पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना वाटण्यासाठी ५ कोटी आहे.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात.
ओबीसींनी ओपनमध्ये येणे हेच त्यांच्या फायद्याचे ठरेल, त्यासाठी त्यांना आपण तसे आवाहन करणार असल्याचे उपहासात्मक विधान काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुण्याच्या खडकवासला येथे काँग्रेस पक्षान कार्यशाळेचे आयोजन केले आहे, या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासन भिकारी असल्याचे म्हटल्याने नवीन वाद सुरु झाला आहे. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमधील रम्मी खेळताना व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना टोला लागवला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू असताना देशामध्ये राजकीय पक्षांकडून तिरंगा रॅली काढल्या जात आहेत. याबाबत अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मतांना विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे.
फळबागा भाजीपाला धान नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कंबरड मोडलेल आहे. तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई घोषित करावी.
कॉंग्रेस पक्षाने भारत पाकिस्तान युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाबत वादग्रस्त विधान केले. यानंतर जोरदार टीका झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी सरकारला जबाबदार धरले आणि दहशतवाद्यांनी पीडितांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावरुन संशय व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ला हे मोदी सरकारचे अपयश आहे असा आरोप देखील वडेट्टीवार यांनी दिले आहे.
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातून टीका करणाऱ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली.