
दिल्ली – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभा यांचे सत्र वाढले आहेत. आरोप प्रत्यारोप विरोधकांवर केले जात असून राजकीय टीका टिप्पणी केल्या जात आहेत. दरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराने वादग्रस्त विधान केले आहे. संविधानाबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
भाजपचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार लल्लू सिंह यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. यंदा भाजपने पॉलिटिकल कॅपेनमध्ये अब की पार 400 पार चा नारा दिला आहे. 400 हून अधिक जागा निवडणून येणार असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र 400 पार खासदार का निवडणून यायला पाहिजे याबाबत लल्लू सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे.
प्रचारावेळी बोलताना विद्यमान खासदार आणि उमेदवार लल्लू सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे, पण संविधानात दुरुस्ती करण्यासाठी किंवा संविधान बदलण्यासाठी दोन तृतियांश जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा नियमही बदलावा लागेल आणि संविधान देखील बदलावं लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले असून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
PDA भाजपा को मिलकर हराएगा क्योंकि भाजपा पिछड़ों, दलितों, अल्पसंख्यकों को मिले आरक्षण को, नया संविधान बनाकर ख़त्म करना चाहती है। भाजपा जनता की सेवा या कल्याण के लिए नहीं बल्कि बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी द्वारा बनाए संविधान को बदलने के लिए जीतना चाहती है। सदियों से 4-5%… pic.twitter.com/bvFf1AioXX — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2024
काँग्रेसकडून टीका
काँग्रेसने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचे नेता पवन खेरा यांनी लल्लू सिंह यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, स्वत: बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत. पण, आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ४०० जागांची जनतेला मागणी करत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करु शकतील का? असा सवाल पवन खेरा यांनी केलाय. त्याचबरोबर अखिलेश यादव यांनी देखील व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.